शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तिसरी लाट ओसरली; आतापर्यंत 7745 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

कोरोनाच्या तिन्ही लाटेत मिळून आजपर्यंत ६७ हजार ८५६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी ६६ हजार ६६७ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. सध्या दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ०.६३ इतका असून एकूण पाॅझिटिव्हिटी दर ११.९० इतका आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ इतके आहे. बुधवारी १२७४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत ७ हजार ७४५ व्यक्ती बाधित झाल्या असून आठ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४७ रुग्ण सक्रिय असून बाधित झालेल्यांपैकी ७ हजार ६९० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटेत मिळून आजपर्यंत ६७ हजार ८५६ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यापैकी ६६ हजार ६६७ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. सध्या दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर ०.६३ इतका असून एकूण पाॅझिटिव्हिटी दर ११.९० इतका आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२५ इतके आहे. बुधवारी १२७४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आठ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. यात भंडारा, मोहाडी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर लाखनी तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत तालुकानिहाय आकडेवारीत भंडारा १३, मोहाडी ३, तुमसर व पवनी प्रत्येकी २, लाखनी १५, साकोली ९, तर लाखांदूर तालुक्यातील तीन बाधितांचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ११३४ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिसऱ्या लाटेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत मृत्यू दर ०१.६८ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५ लाख ७० हजार ४०३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ५२१, मोहाडी १००, तुमसर १२९, पवनी ११३, लाखनी ९९, साकोली १०९, तर लाखांदूर तालुक्यातील ७१ जणांचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेत भंडारा व मोहाडी तालुक्यातील २, पवनी तालुक्यातील १, तर साकोली तालुक्यातील तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेतील मृत्यू दर ०.१० टक्के इतका आहे.

१४ हजार ४८१ व्यक्तींनी घेतला प्रिकाॅशन डोस- जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती सुयोग्य स्थितीत आहे. आतापर्यंत जिल्हाभरात दोन्ही डोस मिळून १७ लाख ९० हजार ५७३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ५४ हजार ४४९ इतकी असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख २१ हजार ६४३ इतकी आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेदरम्यान शासनाने सुरू केलेला प्रिकाॅशन डोस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या १४ हजार ४८१ इतकी झाली आहे. प्रभावी जनजागृतीमुळे जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी उत्तम आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या