शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सौर कृषी पंप योजनेतून संपणार भारनियमनाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 12:35 IST

शेतकऱ्यांनो, अर्ज केला का? : 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना'

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' सुरू करण्यात आली आहे. यामुळे भारनियमनाची समस्या संपून, संपूर्ण आठ तास नियमित पाणी मिळण्यास मदत होईल. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील. लाभार्थी निवडीचे निकष महावितरणने निश्चित केले आहेत. पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांस ३ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरवरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाईल. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषिपंपाची मागणी केल्यास ती ग्राह्य धरली जाईल. 

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहीर व नदी, आदी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी हे पंप वापरता येणार नाही. 

अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ ज्यांना मिळाला नाही, ते शेतकरीदेखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. 

काय आहे 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना'? ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंच- नाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. राज्यात सौर कृषी पंप कार्यान्वित होणार आहेत.

पाच वर्षांची दुरुस्ती हमीमागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे. सर्वसाधारण गटाच्याशेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच दिला जाईल. अनुसूचित जाती-जमातींच्या शेत- कऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के भरावा लागेल. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार- कडून अनुदान म्हणून दिली जाईल. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचा पंप योजनेंतर्गत दिला जाईल. सौर पंपाची पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्ससह संच दिला जाणार आहे. सौर ऊर्जेवर पंप चालणार असल्याने वीज बिल येत नाही, त्यामुळे भारनियमनाची चिंता शेतकऱ्यांना नाही. 

येथे करावा लागेल अर्ज 

  • मागेल त्याला कृषी पंप योजनेसाठी शेतकरी महावित- रणच्या mahadiscom.in/solar या वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. 
  • सध्याच्या कृषी पंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी, आदी तपशील देणे अनिवार्य आहे. सातबारा उतारा प्रत, आधार कार्ड, एससी, एसटी लाभार्थीसाठी जात प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा