शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या एक वेळ बदली धोरणाचा फज्जा, अडथळ्यांची शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:26 IST

Bhandara : प्रत्यक्षात धोरणाची अंमलबजावणी होण्याआधीच अडथळ्यांमुळे बदल्या न झालेल्या अनेक अधिकाऱ्यांतून नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील विविध आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या (CHO) सेवाकालात एक वेळची बदली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. या धोरणांतर्गत बदलीसाठी विविध निकषांवर आधारित अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात धोरणाची अंमलबजावणी होण्याआधीच अडथळ्यांना सामोरे जावे लागले असून, बदल्या न झालेल्या अनेक अधिकाऱ्यांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

राज्यभरातून तब्बल २,०१८ बदल्यांचे अर्ज आरोग्य विभागास प्राप्त झाले होते. त्यात पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार व विनंती अर्ज अशा विविध कारणांचा समावेश होता. अर्ज १२ जूनपर्यंत मागविण्यात आले. त्यानंतर १३ ते १९ जून या कालावधीत छाननी सिद्ध करण्यात आली. पात्र अधिकाऱ्यांची यादी २० जून रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. दि. २३ ते दि. २५ जूनदरम्यान जिल्हास्तरावर समुपदेशनही घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात फक्त ६५२ सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. उर्वरित १,१५६ अधिकाऱ्यांना बदल्यापासून वंचित ठेवण्यात आले. यामागे 'जातनिहाय बिंदू नसणे' हे कारण सांगण्यात आले. परिणामी, अनेक अधिकाऱ्यांना १५ दिवस जिल्हास्तरावर वाट पाहूनही केवळ निराशाच पदरी पडली.

बदल्यांनंतरही अन्याय का?सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आरक्षण निकष महत्त्वाचे असले तरी बदल्यांसारख्या एक वेळच्याच धोरणामध्ये याचा अतिरेक अनावश्यक अडथळा ठरत असल्याची भावना कर्मचारीवर्गामध्ये आहे. बदल्या करतेवेळी मूळ प्रवर्गाचा विचार न करता फक्त नियुक्ती वेळेचा प्रवर्ग ग्राह्य धरणे किंवा आरक्षण बिंदूच्या आधारावर अपात्र ठरवणे, यामुळे अनेकांना न्याय मिळालेला नाही.

"या संपूर्ण प्रक्रियेमुळे आज हजारो आरोग्य अधिकारी अनिश्चिततेत अडकले आहेत. राज्य शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आरोग्य व्यवस्थेला अपेक्षित बळ द्यावे."- अशोक जयसिंगपुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना

टॅग्स :bhandara-acभंडारा