शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी नावाची फक्त शान अन् उद्योगाला आहे वाण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:41 IST

उद्योगाची स्थिती बिकट : रोजगाराचा प्रश्न आला ऐरणीवर

राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : तालुक्यात अपेक्षित असा उद्योगांचा विकास नाही. रोजगाराच्या आशा कायम आहेत. वरठी येथील सनफ्लॅग कंपनीचा अपवादवगळता तालुक्यातील मिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नावापुरतीच दिसत आहे. त्यामुळे औद्योगिक रोजगाराचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या ऐरणीवर येणार काय? याकडे बेरोजगारांचे लक्ष लागले आहे. मोहाडीत असलेली एमआयडीसी 'नावाची शान अन उद्योगाला वाण' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मोहाडी - तुमसर मार्गावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा मिनी इंडस्ट्रियल एरिया आहे. या ठिकाणी बोटावर मोजण्याएवढे उद्योग आहेत. परंतु, अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असे उद्योगच दिसून येत नाहीत. मोहाडीच्या एमआयडीसी क्षेत्रात अनेकांनी भूखंड ताब्यात घेतले. मात्र, उद्योगाची निर्मिती होऊ शकली नाही. सनफ्लॅग वरठी येथे स्थिर झालेल्या उद्योगात रोजगार दिला जातो. देव्हाडा येथे असलेला साखर कारखाना व एलोरा पेपर मिल येथे हवा तेवढा रोजगार मिळत नाही. बारमाही हाताला काम मिळेल असा एकही उद्योग मोहाडीत नाही. तालुक्यातील बेरोजगार रोजगाराच्या शोधात तालुक्याच्या बाहेर पडत असतात. 

मोहाडी तालुक्यात महिलांचे गावागावात बचत गट आहेत. पण, प्रत्येक गटाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग केंद्र उभारण्यात आलेले नाही मोहाडीतील क्रीडा संकुल अनेक दिवसांपासून न्यायालयात अडकून पडले आहे. क्रीडांगण, क्रीडा साहित्याचा अभाव क्रीडा स्पर्धा घेण्यास अनेक अडचणींना समोर जावे लागते. ३३ कोटीची पाणीपुरवठा योजना अजूनही कार्यान्वित झाली नाही. परिणामी मोहाडीच्या जनतेला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मिरची  व्यवसायाला उद्योगाची योग्य चालना देण्यात आली नाही. पेंच प्रकल्प असो की, बावनथडी प्रकल्प शेवटच्या टोकावर असणाऱ्या शेतकऱ्याला 'टेल टू हेड' असे पाण्याचे वितरण होत नाही. 

'दुग्ध व्यवसायाचा उद्योग नाही' मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. तालुक्यातील अनेक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुसरीकडे अनेक गावांमध्ये खासगी दुग्ध संकलन केंद्र दिसून येतात. तालुक्यातील दूध खासगी मालकांना विक्री केला जातो जातो. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध संकलित होत असले तरी इथे दुधावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही उद्योग उभारला गेला नाही.

'जमिनी गेल्या, प्रकल्प आलाच नाही' एक दशकापूर्वी रोहणा येथे वीज प्रकल्पाची निर्मिती होईल, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. परंतु, त्यानंतर एक टक्काही वीज प्रकल्पाचे काम कुठेच दिसून येत नाही. वीज प्रकल्प उभे झाले असते, तर आजघडीला हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले असते.

टॅग्स :bhandara-acभंडाराMIDCएमआयडीसी