शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक बाहुली विहिरीला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 15:27 IST

आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत.

ठळक मुद्देशासन प्रशासनाचे दुर्लक्ष : अजूनही पाण्याचे स्रोत कायम, गाळ उपसा करणे महत्त्वाचे

विशाल रणदिवे

अड्याळ (भंडारा) : पवनी तालुक्यातील अड्याळजवळील विरली खंदार गावालगत असलेली ऐतिहासिक बाहुली विहीर आज शेवटच्या मार्गावर आली आहे. तिची आजपावेतो शासन वा प्रशासनाने दखल घेतली नाही. तब्बल अडीचशे ते तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या पिढीलाही ऐतिहासिक बाहुली विहीर म्हणजे काय व कशी असते हे कळणारसुद्धा नाही!

आजपर्यंत ही ऐतिहासिक बाहुली विहीर प्रकाशझोतात न येण्याची कारणे काहीही असली तरी मागील महिन्यात झालेल्या शिवजयंतीनिमित्त या विहीर व परिसराची साफसफाई येथील युवा ग्रामस्थांनी केली. आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. यासाठी आता तात्काळ शासनाने मदतीसाठी पुढे येणे गरजेचे झाले आहे.

बाहुली विहिरीवर त्याकाळी रघुजी राजे भोसले तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भेट दिल्याचे येथील ज्येष्ठ वयोवृद्ध ग्रामस्थ सांगतात. त्या काळात विशेषतः बैलबंडीचा मार्ग असल्याने याठिकाणी नेहमीच वाटसरू मुक्काम ठोकत असत. अनेक प्रवासी व ग्रामस्थ याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी येत असत. पाणीटंचाईच्या काळात या विहिरीमुळे परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ या विहिरीच्या पाण्यासाठी येत होते; परंतु जसजसा काळ बदलला, तसतसे या विहिरीकडे सर्वांचे दुर्लक्ष होत गेले.

या ऐतिहासिक बाहुली विहिरीविषयी अधिक माहिती गोळा करत असताना येथील त्याकाळी आत्माराम नागोराव ब्राह्मणकर पाटील विरली खंदार यांच्या वाड्यात रघुजी राजे भोसले यायचे, तसेच त्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना १९४४ ते ६६ या काळात ग्रामस्थांनी दोनदा प्रबोधनसाठी आणले होते. त्या काळात बलदेव बाबा परिसर ग्राउंडमध्ये दोनदा मोठी सभा झाली होती. तेव्हा ते दृश्य अकल्पनीय असल्याचे आजही सांगितले जाते.

जर्जर झालेल्या ऐतिहासिक बाहुली विहिरीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. यासाठी शासनाने तात्काळ मदत करावी; अन्यथा ऐतिहासिक वारसा नष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही.

- तुकाराम ब्राह्मणकर, वयोवृद्ध नागरिक, विरली खंदार

टॅग्स :SocialसामाजिकhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणbhandara-acभंडारा