शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक बाहुली विहिरीला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 15:27 IST

आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत.

ठळक मुद्देशासन प्रशासनाचे दुर्लक्ष : अजूनही पाण्याचे स्रोत कायम, गाळ उपसा करणे महत्त्वाचे

विशाल रणदिवे

अड्याळ (भंडारा) : पवनी तालुक्यातील अड्याळजवळील विरली खंदार गावालगत असलेली ऐतिहासिक बाहुली विहीर आज शेवटच्या मार्गावर आली आहे. तिची आजपावेतो शासन वा प्रशासनाने दखल घेतली नाही. तब्बल अडीचशे ते तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या पिढीलाही ऐतिहासिक बाहुली विहीर म्हणजे काय व कशी असते हे कळणारसुद्धा नाही!

आजपर्यंत ही ऐतिहासिक बाहुली विहीर प्रकाशझोतात न येण्याची कारणे काहीही असली तरी मागील महिन्यात झालेल्या शिवजयंतीनिमित्त या विहीर व परिसराची साफसफाई येथील युवा ग्रामस्थांनी केली. आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. यासाठी आता तात्काळ शासनाने मदतीसाठी पुढे येणे गरजेचे झाले आहे.

बाहुली विहिरीवर त्याकाळी रघुजी राजे भोसले तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भेट दिल्याचे येथील ज्येष्ठ वयोवृद्ध ग्रामस्थ सांगतात. त्या काळात विशेषतः बैलबंडीचा मार्ग असल्याने याठिकाणी नेहमीच वाटसरू मुक्काम ठोकत असत. अनेक प्रवासी व ग्रामस्थ याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी येत असत. पाणीटंचाईच्या काळात या विहिरीमुळे परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ या विहिरीच्या पाण्यासाठी येत होते; परंतु जसजसा काळ बदलला, तसतसे या विहिरीकडे सर्वांचे दुर्लक्ष होत गेले.

या ऐतिहासिक बाहुली विहिरीविषयी अधिक माहिती गोळा करत असताना येथील त्याकाळी आत्माराम नागोराव ब्राह्मणकर पाटील विरली खंदार यांच्या वाड्यात रघुजी राजे भोसले यायचे, तसेच त्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना १९४४ ते ६६ या काळात ग्रामस्थांनी दोनदा प्रबोधनसाठी आणले होते. त्या काळात बलदेव बाबा परिसर ग्राउंडमध्ये दोनदा मोठी सभा झाली होती. तेव्हा ते दृश्य अकल्पनीय असल्याचे आजही सांगितले जाते.

जर्जर झालेल्या ऐतिहासिक बाहुली विहिरीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. यासाठी शासनाने तात्काळ मदत करावी; अन्यथा ऐतिहासिक वारसा नष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही.

- तुकाराम ब्राह्मणकर, वयोवृद्ध नागरिक, विरली खंदार

टॅग्स :SocialसामाजिकhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणbhandara-acभंडारा