शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

साकोलीत उभारलेले बांबू क्लस्टर धूळ खात; दोन कोटींचा निधी व्यर्थ, कारागिरांचे हात रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:35 IST

Bhandara : केंद्र शासनाचा प्रकल्प ठप्प; आदिवासी व बुरड कारागिरांचे आर्थिक भविष्य संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली: केंद्र शासनाच्या 'स्फूर्ती' योजनेअंतर्गत एमएसएमई मंत्रालयाच्या माध्यमातून २ कोटी १० लाख रुपयांच्या निधीतून साकोली येथे उभारण्यात आलेले बांबू क्लस्टर युनिट सध्या अक्षरशः धूळ खात पडले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व बुरड समाजातील बांबू कारागिरांना रोजगार व कौशल्य विकासासाठी तयार केले गेलेले हे केंद्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आज निष्क्रिय अवस्थेत आहे. 

साकोली येथील बांबू क्लस्टर हे आदिवासी आणि बुरड समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन ठरू शकते. पण, प्रशासकीय इच्छाशक्ती दुर्लक्षित धोरणामुळे हे केंद्र निष्क्रिय बनले आहे. २०१९ साली केंद्र शासनाच्या स्फूर्ती योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकमेव बांबू क्लस्टर केंद्रास मान्यता मिळाली  पंचशील आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था मर्यादित, बाम्हणीचे अध्यक्ष केशव घरत आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. बांबू ट्रीटमेंट प्लांट, आधुनिक यंत्रसामग्री (टर्निंग लेथ, स्टैंड ड्रिल, लेझर मशीन इ.) सह २०२२ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. 

केंद्र कोरोना काळात केंद्र बंद राहिले. त्यानंतर प्रशासनाने कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे हे क्लस्टर जोमाने कार्यरत होऊ शकले नाही. संस्थेने १६ लाख ७० हजार रुपयांची स्वतंत्र गुंतवणूक केली असतानाही, केंद्र अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. यामुळे हे केंद्र सुरु करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

बाजारात वाढती मागणी, पण पूर्तता नाहीकिचन वेअर, गृह सजावट वस्तू, फर्निचर ऑफिस टेबल खुर्चा, अलमारी, यांसारख्या क्षेत्रांत बांबूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढत असताना, साकोलीचे हे क्लस्टर निष्क्रिय अवस्थेत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या इको-फ्रेंडली धोरणामुळे बांबू वस्तूंना शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कार्यालयात वापरण्याचे जाहीर केले आहे. या परिसरात ग्रामीण भागामध्ये अनेक बांबू कारागिर आहेत. मात्र या प्रकल्पाच्या माध्यमातून कोणतेही काम न झाल्याने या बांबू कारागिरांना न्याय मिळू शकला नाही. परिणामतः अन्य रोजगाराकडे त्यांना नाईलाजाने वळावे लागत आहे. या कारागिरांचा विचार व्हावा अशी मागणी आहे.

"साकोलीतील बांबू क्लस्टर प्रकल्प उपयुक्त असून, त्याला पुनर्जीवित करण्याची गरज आहे. संस्थेच्या बांबू क्लस्टर प्रकल्पाला वन विभागाच्या माध्यमातून प्रशासनिक पातळीवर त्वरित कृती करून हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी वनविभाग कटिबद्ध आहे."- संजय मेंढे, सहायक वनसंरक्षक

"केंद्राला चालना मिळावी यासाठी शासन स्तरावर जनजागृती आणि प्रशिक्षण शिबिरांची गरज आहे. अन्यथा संधी गमावून हा प्रकल्प फक्त एक स्मारक म्हणूनच उरेल."- रवींद्र घरत, केंद्र संचालक

टॅग्स :bhandara-acभंडारा