शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन, कोरोनाने वाढविली पालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाचे टर्निंग पॉइंट समजले जाते. काेरोनामुळे दोन्ही परीक्षा उशिरा होणार आहेत  भंडारा जिल्ह्यातून इयत्ता दहावीला १८ हजार  तर इयत्ता बारावीला १५ हजाराच्यांवर परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये हीच चिंता पालकांना सतावत आहे.

ठळक मुद्देसुरक्षितता महत्वाची : पालक म्हणतात, कॅरीअरसह आरोग्य जपणे गरजेचे

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा  :  कोरोनाच्या सावटात इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या.   इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या या निर्णयामुळे पालकांमध्ये थोडीफार का असेना चिंतेचे वातावरण पसरले आहे कॅरियरसोबत आरोग्य जपणेही महत्त्वाचे आहे, असा सूरही पालकगण व्यक्त करीत आहेत.दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाचे टर्निंग पॉइंट समजले जाते. काेरोनामुळे दोन्ही परीक्षा उशिरा होणार आहेत  भंडारा जिल्ह्यातून इयत्ता दहावीला १८ हजार  तर इयत्ता बारावीला १५ हजाराच्यांवर परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये हीच चिंता पालकांना सतावत आहे.

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये, याची काळजी शिक्षण मंडळाने अगत्याने घेणे महत्वाचे आहे.- दिलीप गोन्नाडे,  पालक

दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे आव्हानात्मक काम आहे.-  सुलोचना निखारे,  पालक

पाल्यांचे भविष्य सोबतच त्यांच्या आरोग्याची चिंता असणे ही स्वाभाविक बाब आहे. केंद्र असलेल्या ठिकाणी योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे.- कविता दलाल पालक

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

परीक्षा, विद्यार्थी दशेतील अतिशय महत्वाची बाब आहे. पालकंसह पाल्यांच्या मनातील भिती दूर होणे महत्वाचे आहे. त्याबाबत जागृती करावी.- डॉ. गोपाल व्यास,  पालक

पालकांमध्ये  चिंतेचे वातावरण  आहे. येणारी वेळ कशी राहील, हे सांगता येत नाही. कॅरियरसोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य जपावे लागणार आहे. -डॉ.विरेंद्र कुकडे ,  पालक

ऑनलाइन पेपर नकोच. पाल्याने वर्षभरातीलअभ्यासाचे फलीत व्हायला हवे. कोरोनाची भिती न बाळगता नियमांचे पालन करीत परीक्षा व्हाव्यात.- वैशाली कटकवार पालक

 

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण