शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:58 IST

Bhandara News धान भरडाईच्या रकमेवरून शासन आणि राईस मिलर्स यांच्यातील तिढा अद्यापही सुटला नाही. परिणामी तब्बल दहा लाख क्विंटल धान सद्यस्थितीत उघड्यावर आहे.

ठळक मुद्देडीओचा तिढा कायम शासन आणि मिलर्सच्या वादात शेतकरी भरडतोय

 लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धान भरडाईच्या रकमेवरून शासन आणि राईस मिलर्स यांच्यातील तिढा अद्यापही सुटला नाही. परिणामी तब्बल दहा लाख क्विंटल धान सद्यस्थितीत उघड्यावर आहे. सर्व गोदामे हाऊसफुल्ल झाली असून दुसरीकडे राईस मिलर्स डीओ उचलायला तयार नाही. अशीच स्थिती कायम राहिल्यास धान खरेदी ठप्प होण्याची भीती आहे.

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १७ लाख ९८ हजार ८३ क्विंटल धानाची आधारभूत केंद्रावर खरेदी करण्यात आली. दरवर्षी खरेदी झालेला धान गोदामात ठेवून तो मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. परंतु यावर्षी भरडाईचे दर वाढून देण्याच्या मुद्यावरून जिल्ह्यातील एकाही मिलर्सने डीओ उचलला नाही. परिणामी गोदामात धान पडून आहे. जिल्ह्यातील धान साठवण गोदामाची क्षमता केवळ आठ लाख क्विंटल आहे. त्यात खासगी सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामांचा समावेश आहे. अपुऱ्या गोदामांची समस्या असताना २ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १८ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली. एकीकडे धानाची उचल नाही आणि दुसरीकडे जिल्ह्यातील ९४ आधारभूत केंद्रांवर खरेदी सुरू आहे. अशा स्थितीत खरेदी झालेला धान उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या १० लाख क्विंटल जिल्ह्यातील विविध आधारभूत खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेला आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस झाला होता. त्याचा फटका काही प्रमाणात बसला. सुदैवाने अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला नाही. अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागले असते.

जिल्ह्यातील २०३ मिलर्सनी पणन महासंघासोबत भरडाईसाठी ग्रिमेंट केले आहे. जिल्हा पणन कार्यालयाने ८० हजार क्विंटलचे डीओ तयार केले आहे. परंतु एकाही मिलर्सने अद्याप भरडाईसाठी धान उचलला नाही. शासन आणि मिलर्स यांच्यात सुरू असलेल्या या वादाचा फटका मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने जिल्ह्यातील ९४ आधारभूत केंद्रावरील खरेदी संथगतीने सुरू आहे. शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. शासनाने या प्रकरणात तात्काळ तोडगा काढून धान भरडाईसाठी पाठविणे गरजेचे झाले आहे.

२७६ कोटींचे धान चुकारे

जिल्ह्यात ९४ आधारभूत खरेदी केंद्रांवर १७ लाख ९८ हजार ८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आधारभूत किमतीनुसार या धानाची किंमत ३३५ कोटी ८८ लाख १९ हजार ७३५ रुपये आहे. यापैकी २७६ कोटी ४६ लाख ३७ हजार २३५ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. तर ५९ कोटी ४१ लाख ८२ हजार ४९९ रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी लाखांदूर तालुक्यात तीन लाख ९५ हजार ४०८ क्विंटल झाली असून सर्वात कमी खरेदी भंडारा तालुक्यात एक लाख २१ हजार २४६ क्विंटल खरेदी झाली आहे.

गोदामांची समस्या कायमच

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु धान साठविण्यासाठी गोदामांचा अभाव आहे. येथे खरेदी झालेला धान खासगी, सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामांमध्ये ठेवावा लागतो. या गोदामांची क्षमता केवळ आठ लाख क्विंटल आहे. त्यामुळे खरेदी झालेला धान ठेवण्याचा प्रश्न निर्माण होतो. गोदामांअभावी धान खरेदीची गतीही मंदावते.

टॅग्स :agricultureशेती