शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

टी.सी.करिता विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:08 IST

सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देप्रकरण सिहोरा येथील महाराष्ट्र शाळेचे : सोमवारी दाखला न मिळाल्यास विद्यार्थ्यांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिहोरा येथील एका शाळेच्या दोन संस्थेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना दिला जात नाही. याप्रकरणी थेट विद्यार्थ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात धडक दिली. सोमवारी १७ जून रोजी शिक्षणाकाऱ्यांनी सिहोरा येथे येऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलकर्ते विद्यार्थी माघारी परतले. सोमवारी सदर तिढा सुटतो की पुन्हा चिघळतो याकडे पालकासह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.सिहोरा येथे महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असून येथे दोन संस्थेचा वाद मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. एका संस्थेच्या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी मुख्याध्यापक पदाला मान्यता दिली. तर दुसºया संस्थेने त्यावर आक्षेप घेतला. येथे मुख्याध्यापक पदावरुन दोन संस्थेत वाद सुरु आहे. संस्थेबाबत व मुख्याध्यापक पदासंदर्भात प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहे.इयत्ता दहावी व बारावी परिक्षेचा निकाल जाहिर झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून मिळणे क्रमप्राप्त आहे, परंतु संस्थेच्या वादामुळे शाळा सोडल्याचा दाखल्यावर स्वाक्षरी कोण करणार अशी मुख्य समस्या निर्माण झाली आहे. शाळेच्या रेकॉर्ड कुठे आहे, कुणाजवळ आहे. इत्यादी प्रश्न येथे उपस्थित झाले आहे. दररोज विद्यार्थी शाळेत दाखल्याकरिता जातात व रिकाम्या हाताने परत येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट सिहोरा पोलीस स्टेशनवरच धडक दिली.आम्हाला शाळा सोडल्याचा दाखला हवा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात लावून धरली. पोलीस ठाण्यात तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर, सिंदपूरीचे मोरे, पं.स. सदस्य हिरालाल नागपूरेसह सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या भेटीला गेले. कालम शेख यांनी शिक्षणाधिकारी काटोलकर यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. सोमवारी शिक्षणाधिकारी काटोलकर व त्यांचे प्रतिनिधी सिहोरा येथे महाराष्ट्र शाळेत दाखल होऊन विद्यार्थ्यांची समस्या दूर करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थी पोलीस ठाण्यातून माघारी परततले. सिहोऱ्याचे ठाणेदार गायकवाड यांनी प्रकरण योग्यरितीने हाताळले.सिहोरा येथील महाराष्ट्र शाळेत दोन संस्थेचे वाद सुरु आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल्याची समस्या दूर न केल्यास आंदोलन करण्यात येईल.- कलाम शेख, माजी सभापती पं.स. तुमसरसिहोरा परिसरातील शेतकऱ्यांची मुले महाराष्ट्र शाळेत शिक्षण घेत आहेत. शाहेच्या वादाशी विद्यार्थ्यांना काही देणे-घेणे नाही. विद्यार्थ्यांची समस्या सोमवारी न सुटल्यास अधिकाºयांना घेराव करण्यात येईल.- शुभम गभने, प्रदेश सचिव एनएसयुआय,तुमसर

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा