शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

तंटामुक्त गाव मोहिमेचे काम थंडावले

By admin | Updated: December 29, 2014 23:37 IST

राज्य शासनाच्या गृह खात्यामार्फत राज्य तंटामुक्त करण्याचे उद्दिीट ठेवून आठ वर्षांपूर्वी सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता थंडावल्याचा प्रयत्य दिसून येत आहे. या मोहिमेच्या

भंडारा : राज्य शासनाच्या गृह खात्यामार्फत राज्य तंटामुक्त करण्याचे उद्दिीट ठेवून आठ वर्षांपूर्वी सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता थंडावल्याचा प्रयत्य दिसून येत आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पोलीस व महसूल प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज असताना सध्या या दोन्ही विभागाचे या मोहिमेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.‘शांततेकडून समृद्धीकडे’ असे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावातील तंटे गावपातळीवरच मिटवून गावात शांतता प्रस्थापित व्हावी, नागरिकांच्या श्रम व पैशाची बचत होऊन महाराष्ट्र देशात आदर्श राज्य ठरावे, आदी उदात्त हेतूंनी या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता. मागील काही वर्षात शेकडो गावे तंटामुक्त करण्यात आली. अनेक गावांमधून या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. हजारो गावांनी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी होऊन हजारो तंटे गावातच तडजोडीने मिटविले. यामध्ये फौजदारी, दिवाणी व महसूल या सोबतच मोठ्या तंट्यांचाही समावेश होता. सर्व छोटे-मोठे तंटे गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी गावातच मिटविण्याचा विक्रम राज्यभर करून अन्य राज्यांसमोर आदर्श निर्माण केला. या तंटामुक्त गावांना शासनानेही लोकसंख्येच्या प्रमाणात एक लाखांपासून ते दहा लाखांपर्यंतची रोख बक्षिसे देऊन सन्मानित केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत १५ आॅगस्ट ते ३० एप्रिलपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यंदा मोहिमेचे आठवे वर्ष आहे. सन २०१४ या वर्षाला प्रारंभ होऊन सुमारे आठ महिने झाले आहे. परंतु या मोहिमेमध्ये आवश्यक तो प्रतिसाद आणि उत्साह दिसून आलेला नाही. या मोहिमेचे तालुकास्तरावर तहसीलदार हे अध्यक्ष असतात. संबंधित ठाण्याचे ठाणेदार सचिव असतात. पोलीस पाटील समितीचे निमंत्रक असतात. या तंटामुक्त गाव समितीच्या वर्षातून किमान तीन ते चार बैठका घेऊन संपूर्ण गावाला मोहिमेत सक्रिय करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम समितीला करावे लागते. परंतु, तालुक्यातील कोणती गावे यंदा या मोहिमेत सहभागी झाली, याची नोंद पोलीस ठाण्यात अद्यापही दिसत नाही. तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी गावानी राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्र मांसाठी तीन नोंदवह्या अद्ययावत ठेवाव्या लागतात. परंतु अनेक गावांना अजूनही नोंदवही देण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर मोहीम थंडीच्या हंगामात थंडावल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी प्रत्येक पोलीस ठाण्याला तंटामुक्त गावासाठी उद्दीष्ट दिले जाते. त्यानंतर सर्वांची एकाचवेळी धावपळ सुरू होते. परंतु, आतापासून तालुकास्तरीय समितीने लक्ष दिल्यास वेळेवरची धावपळ टाळता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)