शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महापुरातून धडा घेत प्रशासन होते 24 तास अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स विसर्ग सुरू झाल्याने पूरपरिस्थितीची शक्यता निर्माण झाली. नियोजनबद्ध उपाययोजना करून प्रशासनाने परिस्थितीवर मात केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन वर्षापूर्वी वैनगंगेला आलेल्या महापुराने सर्वत्र हाहाकार उडाला होता. कोट्यवधी रुपयांचे नुकसान या महापुराने झाले होते. या महापुरातून धडा घेत जिल्हा प्रशासन यावेळी २४ तास अलर्ट होते. अतिवृष्टी होऊनही जिल्ह्यात कुठेही मोठे नुकसान झाले नाही. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणेच्या सतत संपर्कात राहून सूचना दिल्याने पूरपरिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला यश आले.जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स विसर्ग सुरू झाल्याने पूरपरिस्थितीची शक्यता निर्माण झाली. नियोजनबद्ध उपाययोजना करून प्रशासनाने परिस्थितीवर मात केली.

गावागावांत होमगार्ड तैनात- भंडारा जिल्ह्यात नदीतीरावर सुमारे १३० गावे आहेत. या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करता याव्या म्हणून गावागावांत होमगार्ड तैनात करण्यात आले. तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठीही अलर्ट मोडवर ठेवण्यात आले होते. 

शेवटच्या घटकापर्यंत प्रशासने होते संपर्कात- धापेवाडा प्रकल्पातून ७ हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गोसेखुर्द धरणातून दोन हजार क्युमेक्स पाणी सोडण्यात येत होते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक झूम मिटिंग घेतली. त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्यासह गोसे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व ठाणेदार उपस्थित होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या. तसेच शेवटच्या घटकापर्यंत प्रशासन संपर्कात होते.३३ गेट उघडून १२ हजार क्युमेक्सपर्यंत विसर्ग- गोसेखुर्द प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. परंतु तेथील जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून प्रशासनाने ३३ गेट उघडण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून १२ हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सतत १५ दिवसापासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तासातासाने मोजणी केली पाणीपातळीभंडारा शहरानजिक वैनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ कारधा येथे पाणीपातळी मोजण्याची यंत्रणा आहे. अतिवृष्टीच्या काळात आपत्ती निवारण विभागाच्या वतीने दर तासाला येथील पाणीपातळी मोजण्यात आली. या पाणीपातळीची माहिती सोशल माध्यमातून नागरिकांपर्यंत           पोहचविण्यात आली. १३ जुलैपासून कारधा येथील वैनगंगेची पाणीपातळी वाढायला लागली. २४२.८ मीटरवरुन ती २४३ मीटरपर्यंत पोहचली. येथे इशारा पातळी २४५ मीटर तर धोकापातळी २४५.५० मीटर आहे. धोकापातळी ओलांडली की सर्व जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळेच येथील पाणीपातळीवर प्रशासन लक्ष ठेवून होते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर