शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकºयांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज, वेळीच तुडतुड्याचे व्यवस्थापन करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानपिकावरील $कीडींचा नायनाट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.फवारणी करताना सुरक्षित कीटचा वापर करावा. शेतकऱ्यांनी अंगावर कीटकनाशक उडणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशकावरील लेबल व माहिती पूर्णपणे वाचून सूचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीचा आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो.हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकऱ्यांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.फवारणी केलेल्या शेतात मनुष्य अथवा जनावरांस चरण्यास प्रवेश करू देऊ नये. कीटकनाशकांचे डबे पुन्हा न वापरता ते खोल खड्ड्यात पुरून टाकावे. तंबाखू, खर्रा खाण्याचे शक्यतो टाळावे. अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणताही धोका न होता फवारणी परिणामकारक होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजीएखादी व्यक्ती फवारणी करत असताना बाधित झाल्यास अथवा कीटकनाशक पोटात गेल्यास त्वचा,डोळे, श्वसनेेंंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते.व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्वरीत अपघात स्थळापासून दूर नेऊन त्याच्या अंगावरचे कपडे त्वरित बदलावे. बाधीत व्यक्तीचे अंग, अवयव साबणाने स्वच्छ धुवावेत. कोरड्या टॉवेलने पुसावे कीटकनाशक पोटात गेल्यास ताबडतोब ओकारी करण्यास सांगावी. जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे, थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे. श्वासोश्वास योग्य रीतीने सुरू आहे का याची तपासणी करावी. कीटकनाशक माहिती पत्रिकेप्रमाणे अँटी बायोटिक घ्यावे. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये बाधित व्यक्तीस त्वरित कीटकनाशकाच्या पत्रकासह डॉक्टरांना दाखवावे. प्राथमिक उपचार करुन त्वरीत दवाखाण्यात नेल्यास जीवीतहानी टळू शकते. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय कार्यालय, भंडाराचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी