शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकºयांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज, वेळीच तुडतुड्याचे व्यवस्थापन करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानपिकावरील $कीडींचा नायनाट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.फवारणी करताना सुरक्षित कीटचा वापर करावा. शेतकऱ्यांनी अंगावर कीटकनाशक उडणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशकावरील लेबल व माहिती पूर्णपणे वाचून सूचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीचा आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो.हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकऱ्यांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.फवारणी केलेल्या शेतात मनुष्य अथवा जनावरांस चरण्यास प्रवेश करू देऊ नये. कीटकनाशकांचे डबे पुन्हा न वापरता ते खोल खड्ड्यात पुरून टाकावे. तंबाखू, खर्रा खाण्याचे शक्यतो टाळावे. अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणताही धोका न होता फवारणी परिणामकारक होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजीएखादी व्यक्ती फवारणी करत असताना बाधित झाल्यास अथवा कीटकनाशक पोटात गेल्यास त्वचा,डोळे, श्वसनेेंंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते.व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्वरीत अपघात स्थळापासून दूर नेऊन त्याच्या अंगावरचे कपडे त्वरित बदलावे. बाधीत व्यक्तीचे अंग, अवयव साबणाने स्वच्छ धुवावेत. कोरड्या टॉवेलने पुसावे कीटकनाशक पोटात गेल्यास ताबडतोब ओकारी करण्यास सांगावी. जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे, थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे. श्वासोश्वास योग्य रीतीने सुरू आहे का याची तपासणी करावी. कीटकनाशक माहिती पत्रिकेप्रमाणे अँटी बायोटिक घ्यावे. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये बाधित व्यक्तीस त्वरित कीटकनाशकाच्या पत्रकासह डॉक्टरांना दाखवावे. प्राथमिक उपचार करुन त्वरीत दवाखाण्यात नेल्यास जीवीतहानी टळू शकते. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय कार्यालय, भंडाराचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी