शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

कृषी स्वावलंबन, क्रांती योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 01:04 IST

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणली आहे. या योजनेत जुन्या व नवीन विहीरींसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती नवबौध्द व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. शेतकºयाच्या नावे जमीन धारणेचा सातबारा व आठ-अ असणे आवश्यक असून वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांच्या वर नसावे. संबंधित शेतकºयाला सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ आॅगस्टपासून आॅनलाईन अर्ज घेण्यास सुरूवात झाली आहे. ४ सप्टेंबरपर्यत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्रत कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडेही सादर करावयाची आहे. १०० टक्के अनुदानावर असलेल्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आहे.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गतही नवीन विहिरीच्या अनुदानासाठी आदिवासी शेतकºयांकडे ०.४० ते ६ हेक्टर शेतजमीन असावी. इतर बाबींच्या लाभासाठी ०.२० हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी, अशी अट आहे.योजनेअंतर्गत, नवीन विहिरीकरिता शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये, तर जुन्या विहीर दुरुस्तीकरीता ५० हजार रु पये, विद्युत जोडणीकरीता १० हजार रुपये, सौर कृषीपंप संचासाठी २० हजार रुपये, सुक्ष्म सिंचनास चालना देण्यासाठी ठिंबक सिंचन संचाकरिता ५० हजार रुपये, तुषार संचासाठी २५ हजार रुपये, तसेच शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना