शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कृषी स्वावलंबन, क्रांती योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 01:04 IST

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणली आहे. या योजनेत जुन्या व नवीन विहीरींसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती नवबौध्द व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. शेतकºयाच्या नावे जमीन धारणेचा सातबारा व आठ-अ असणे आवश्यक असून वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांच्या वर नसावे. संबंधित शेतकºयाला सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ आॅगस्टपासून आॅनलाईन अर्ज घेण्यास सुरूवात झाली आहे. ४ सप्टेंबरपर्यत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्रत कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडेही सादर करावयाची आहे. १०० टक्के अनुदानावर असलेल्या या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आहे.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गतही नवीन विहिरीच्या अनुदानासाठी आदिवासी शेतकºयांकडे ०.४० ते ६ हेक्टर शेतजमीन असावी. इतर बाबींच्या लाभासाठी ०.२० हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी, अशी अट आहे.योजनेअंतर्गत, नवीन विहिरीकरिता शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये, तर जुन्या विहीर दुरुस्तीकरीता ५० हजार रु पये, विद्युत जोडणीकरीता १० हजार रुपये, सौर कृषीपंप संचासाठी २० हजार रुपये, सुक्ष्म सिंचनास चालना देण्यासाठी ठिंबक सिंचन संचाकरिता ५० हजार रुपये, तुषार संचासाठी २५ हजार रुपये, तसेच शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना