शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

पूर स्थितीवर यंत्रणांनी लक्ष ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, करसहाय्यक अधिकारी कपाटे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : पूरपरिस्थितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संततधार पावसामुळे मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भंडारा येथील कारधा पुलावरून पाण्याचा प्रवाह वेगात सुरू झाल्याने वैनगंगेला आलेल्या पूरपस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवार ९ सप्टेंबरला सकाळी कारधा पुलाला भेट दिली. यावेळी वैनंगगा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देत जिल्हयातील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, करसहाय्यक अधिकारी कपाटे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते. संजय सरोवराचे १० दरवाजे १.८० मीटरने सोडण्यात आल्याने ७५.४०० क्यूसेस पाण्याच विसर्ग होत असून यामुळे वैनगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झालेली आहे.भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा नदीच्या पुलावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू झालेला आहे. यामुळे नदीकाठांवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. या पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी भेट दिली. यावेळी पुलावरून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग व पुरस्थितीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी पांचाळ यांनी पुरस्थितीची माहिती दिली. वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश यावेळी दिले.मदतीसाठी प्रशासनाला दिले निर्देशवैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित होवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो याकरिता नगर पालिका प्रशासनाने सज्ज राहावे. नागरिकांना पिण्यायोग्य शुध्द पाणी उपलब्ध करावे असे निर्देश मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना दिले. सोबत शहरातील पुरग्रस्त भागात वैनगंगा नदीचे पाणी शिरकाव झाल्यास येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.कारधा पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून नागरिकांना नदीपासून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

टॅग्स :floodपूर