शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

आदिवासीचे पुनर्वसित गावातून स्वगावी पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:31 IST

बावनथडी प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या आदिवासी बहुल कमकासुर गावाचे पुनर्वसन शासनाने बंदुकीच्या नोकावर तालुक्यातील रायपूर नजीकच्या टोलीवर केले.

ठळक मुद्देप्रशासनात खळबळ : जगणे झाले होते कठीण

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या आदिवासी बहुल कमकासुर गावाचे पुनर्वसन शासनाने बंदुकीच्या नोकावर तालुक्यातील रायपूर नजीकच्या टोलीवर केले. मात्र पुनर्वसन झाल्यापासून ते आजपर्यंत शासनाने वीज, पाणी, धान्य, रोजगार, शिक्षण सारखी कोणती नागरी सुविधा न पुरविल्याने त्या ठिकाणी आदिवासीचे जगणे कठीण झाले होते. परिणामी आता मरण आले तरी बेहतर परंतु स्वगावीच जायचे असे एकमत झाल्याने पुनर्वसित कमकासूरवासीयांनी त्या गावातून लेकराबाळासह गुरूवारी स्वगावी पलायन करताच प्रशासनात एकच खळबळ माजली.बावनथडी प्रकल्पाची गळभरणी करते वेळी कमकासूर येथील आदिवासीयांना कोणताही मोबदला आधी न देता बंदुकीच्या नोकावर सळो की पळो करीत बळजबरीने आदिवासीयांना गावाबाहेर काढले. ज्या पद्धतीने, त्यांना गावाबाहेर काढले त्या पद्धतीनेच शासनाने त्यांच पुनर्वसन करून आवश्यक ती सुविधा पुरविणे गरजेचे होते. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे त्यांना टिनाच्या शेडमध्ये जीवन जगावे लागले. रायपूर नजीक करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात सुरुवातीपासूनच विद्युतची व्यवस्था नाही. सुसुरडोह गट ग्रा.पं. मध्ये येत असलेला कमकासूर हे गाव १५ कि.मी. अंतरावर असल्याने ग्रा.पं. चे दुर्लक्ष होते आहे. इतकेच नव्हे तर स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे स्वस्तात मिळत नाही. गावातील नाल्याचे कधीच उपसा होत नसल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. कमकासूर हे गाव १०० टक्के आदिवासी आहे. कायद्यानुसार आदिवासी यांना भूमीहीन करता येत नाही. पुनर्वसन झालेल्या आदिवासीयांना बेघर व भूमीहीन बनविले आहे. त्यांना कोणत्याही जमिनीचे पट्टे देण्यात आले नाही.पुनर्वसन गावातही रानटी प्राण्यांच्या दहशतीतच जीवन जगत आलो. पलायनानंतरही झाडांच्या आडोशाला संसार थाटून कमीत कमी जीवन जगू.-किशोर उईके, सरपंच, कमकासूर.पुनर्वसन गावातून आदिवासींनी पलायन करू नये म्हणून मी लक्ष्मीकांत सलामे, अनिल टेकाम यांच्यासह गेलो. शासनाने आदिवासीयांच्या समस्येकडे त्वरीत लक्ष घालावे अन्यथा इथे प्रकरण वेगळे वळण घेऊ शकते.-अशोक उईके, आदिवासी नेता व माजी जि.प. सदस्य.महसूल विभागाचे कर्मचारी कमकासूर येथे पाठविले आहे.-निलेश गौंड, ना.तहसीलदार तुमसर.