शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

संकटकाळात ऊस शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:00 AM

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली.

ठळक मुद्देदुहेरी फायदा : तुळशीविवाहाच्या पर्वात ऊसाची मोठी विक्री

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने धान पीक उध्वस्त झाल्याने हतबल असलेल्या अनेक शेतकऱ्यांना उसाने मोठा आधार दिला. तुळशी विवाहाच्या पर्वात मोठ्या प्रमाणात उसाची विक्री होऊन त्यातून रोख शेतकऱ्यांच्या हाती आले. धानासोबत उसाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली. गत आठवड्याभरात शहरात मोठ्या प्रमाणात ऊस विकून शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेवर मात केली.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली. पुर्वी साखर कारखाना सुरु असल्याने ऊसाला मागणी होती. कारखाना बंद पडल्यानंतर पुन्हा शेतकºयांना धान पिकाशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु अनेक शेतकºयांनी धानपिकासोबत ऊसाची लागवड केली. यंदा परतीचा पावसाने धान पीक उध्वस्त झाले. शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ज्यांनी थोडा थोडगा का असेना ऊस लावला होता, त्यांना तुळशीविवाहाने मोठा हातभार लावला. अनेक शेतकऱ्यांनी भंडारा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाची विक्री केली. तुळशीविवाहासाठी उसाची खोपडी आवश्यक असते. शहरातील प्रमुख मार्गावर बैलगाडीने ऊस आणून विक्री केली. ८० ते १०० रुपये पाच ऊसाची विक्री केली. रोख पैसे अनेकांच्या हातात आले. यासोबतच जिल्ह्यात तुमसर, साकोली तालुक्यात गुऱ्हाड आहे. या गुऱ्हाडातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी आता धानासोबतच ऊस लागवडीकडे वळत आहे.कृषी विभागाकडून पुढाकाराची गरजजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान शेती होते. परंतु ही शेती शेतकºयांच्या फायद्याची नाही. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकाचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती