शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
5
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
6
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
7
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
8
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
9
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
10
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
15
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
16
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
17
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
18
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
19
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळात ऊस शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली.

ठळक मुद्देदुहेरी फायदा : तुळशीविवाहाच्या पर्वात ऊसाची मोठी विक्री

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने धान पीक उध्वस्त झाल्याने हतबल असलेल्या अनेक शेतकऱ्यांना उसाने मोठा आधार दिला. तुळशी विवाहाच्या पर्वात मोठ्या प्रमाणात उसाची विक्री होऊन त्यातून रोख शेतकऱ्यांच्या हाती आले. धानासोबत उसाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली. गत आठवड्याभरात शहरात मोठ्या प्रमाणात ऊस विकून शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेवर मात केली.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. निसर्गाच्या अवकृपेने गत काही वर्षात धान उत्पादक देशोधडीला लागले आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा तर बाजारपेठेची समस्या निर्माण होते. भाजीपाला पीक घ्यावे तर त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसतो. अशा स्थितीत गत दोन तीन वर्षांपासून साकोली, तुमसर, पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरु केली. पुर्वी साखर कारखाना सुरु असल्याने ऊसाला मागणी होती. कारखाना बंद पडल्यानंतर पुन्हा शेतकºयांना धान पिकाशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु अनेक शेतकºयांनी धानपिकासोबत ऊसाची लागवड केली. यंदा परतीचा पावसाने धान पीक उध्वस्त झाले. शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ज्यांनी थोडा थोडगा का असेना ऊस लावला होता, त्यांना तुळशीविवाहाने मोठा हातभार लावला. अनेक शेतकऱ्यांनी भंडारा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाची विक्री केली. तुळशीविवाहासाठी उसाची खोपडी आवश्यक असते. शहरातील प्रमुख मार्गावर बैलगाडीने ऊस आणून विक्री केली. ८० ते १०० रुपये पाच ऊसाची विक्री केली. रोख पैसे अनेकांच्या हातात आले. यासोबतच जिल्ह्यात तुमसर, साकोली तालुक्यात गुऱ्हाड आहे. या गुऱ्हाडातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी आता धानासोबतच ऊस लागवडीकडे वळत आहे.

कृषी विभागाकडून पुढाकाराची गरज
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान शेती होते. परंतु ही शेती शेतकºयांच्या फायद्याची नाही. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकाचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती