शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेतीतस्करीला अधिकाऱ्यांचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरु केला आहे. परंतु आता या वाहतुकदारांनाच महसूल प्रशासन आणि पोलीस टार्गेट करीत आहेत.

ठळक मुद्देएल्गार : वैनगंगा वाळू वाहतूकदार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील रेती तस्करीला अधिकाºयांचेच पाठबळ असून त्यांच्या हप्तेखोरीसाठी आम्हाला टार्गेट केले जाते. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्याची वारंवार धमकी दिली जाते. जनमानसात आमची प्रतिमा मलीन होत असून संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करा असे निवेदन वैनगंगा वाळू वाहतूकदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील या वाहतूकदारांनी आता अधिकाऱ्यांविरुद्ध एल्गार पुकारला असून निवेदनात कुणाला किती हप्ते द्यावे लागते आणि शासनाचा कसा महसूल बुडतो याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे महसूल आणि पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरु केला आहे. परंतु आता या वाहतुकदारांनाच महसूल प्रशासन आणि पोलीस टार्गेट करीत आहेत. घाटापासून संबंधित स्थळापर्यंत रेती वाहतूक करताना ठिकठिकाणी अडवणूक केली जाते. कधी महसूलचे पथक तर कधी पोलिसांचे पथक वसुली करीत असतात.या हप्तेखोरीमुळे अनेक वाहनचालकांना क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून न्यावी लागते. यामुळे शासनाचा महसूल तर बुडतोच सोबत रस्त्यांचेही मोठे नुकसान होते. रॉयल्टीची तीन ब्रास रेतीसाठी १२ हजार रुपये दर आहे. तेच विना रॉयल्टीने सात ते आठ हजार रुपयात मिळते. विशेष म्हणजे या वाहतूकदारांना घाटमालक कोणतेही बिल देत नाही. एका घाटावर साधारणत: पाच ते सहा लाख रुपयांचा व्यवसाय होते. परंतु केवळ ५० ते ६० हजार रुपयांचा व्यवसाय दाखवून जीएसटी बुडविली जाते. हा सर्व प्रकार खुलेआम चालत असताना केवळ उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाºया वाहनचालकांना टार्गेट टेले जाते, असे या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर वैनगंगा वाळू वाहतुकदार संघटनेचे अध्यक्ष हरिष कोकासे, उपाध्यक्ष प्रकाश देशकर, शैलेश गजभिये, श्रीराम पोहरकर, भीम बारई यांच्यासह तब्बल ५० वाहतूकदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात ठोस कारवाई करावी अशी मागणी आहे. या निवेदनाने महसूल व पोलीस विभगात खळबळ उडाली आहे?जीपीएस अनब्लॉक का केले जाते ?रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोठून व कोठे होते हे समजते. परंतु काही अधिकारी या वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याऐवजी सरळ ट्रक मालकांशी संपर्क साधून बोलणी करतात, अन्यथा वाहनाचे जीपीएस बंद करण्यात येत आहे असे सांगतात. ठराविक रक्कम वसुल झाल्यानंतर जीपीएस सुरु होते. मोहाडी तहसीलदारांच्या आयडीवरून कितीवेळा लॉगींग केले आणि कितीवेळा ब्लॉक केले याची माहिती महामाईनिंगकडून मिळू शकते. जीपीएस अनब्लॉक का केले जातात याचे स्पष्टीकरण मोहाडी तहसीलदारांकडून घेण्याची माणगी या निवेदनात करण्यात आली आहे.ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्षरेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. परंतु भंडारा येथील आरटीओ कार्यालयासमोरूनच रेतीचे ओव्हरलोड ट्रक धावतात. त्यावर कारवाई केली जात नाही. अवैध व ओव्हरलोड वाहतूक थांबविण्यासाठी जागोजागी पथक फिरविण्यापेक्षा एका ठिकाणी चौकी बसविली तर ही समस्या सुटू शकते. त्याठिकाणी २४ तास कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. तसेच महसूल व पोलीस विभागासोबत परिवहन विभागाचे पथक गठीत करण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :sandवाळू