शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

पाण्याअभावी करपली उन्हाळी पिके

By admin | Updated: May 27, 2016 00:53 IST

उन्हाळी धान पिकांसह अन्य पिकांनाही पाण्याचा पुरवठा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना दाखविण्यात आली.

पवनारा परिसरातील प्रकार : शेतकरी कर्जाच्या खाईत, शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदनपवनारा (तुमसर) : उन्हाळी धान पिकांसह अन्य पिकांनाही पाण्याचा पुरवठा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. मात्र बावनथडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बघेडा जलाशयातून शेतकऱ्यांना पाण्याचे वाटप करण्यात आले नाही. पाणी वाटप संस्थेने पुढाकार घेतला नाही. परिणामी पवनारा परिसरातील शेतकऱ्यांचे उन्हाळी पिके पाण्याअभावी करपली आहेत.तुमसर तालुक्यातील बघेडा जलाशयातंर्गत पवनारा येथे जय किसान मध्यम पाणी वापर संस्था गर्रा (बघेडा) मार्फत पाणी वाटप केला जातो. उन्हाळी धान पिकाकरिता शेवटपर्यंत पाणी मिळेल, असे संस्थेने सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची १००.३० हेक्टरमध्ये लागवड केली. परंतु अंतिम टप्प्यात धान ओंबीवर असल्यामुळे पाण्याअभावी नष्ट झाले तर काहीचे पिके सुकले. यात ५० टक्के नुकसान होऊ न लाखोंचा फटका बसला यासाठी समितीच्या निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तुमसरचे तहसीलदार डी.टी. सोनवाने यांना निवेदन देऊ न नुकसान भरपाईची मागणी केली.बघेडा जलाशय गट नं. १५० आराजी १५७ एकर असून साठवण क्षमता ५.५० मीटर आहे. जानेवारी महिन्यात बावनथडी प्रकल्याचे पाणी बघेडा जलाशयात ५.५० मीटर पाणी सोडण्यात आले. जलाशयाअंतर्गत परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला. परंतु पवनारा येथे शेतकऱ्यांला जबर फटका बसून लाखोंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी बँक कर्ज, सावकारी कर्ज, उधारवाडी घेऊ न धान पिकाची लागवड केली.दररोजच्या महागाईमुळे खत, औषधी, मजूरी आदी खर्चामुळे प्रती एकर १८ हजार रुपये खर्च येतो. उत्पन्न २० हजार रुपयाच्या घरात पिकाचे ५० टक्के नुकसान झाल्यामुळे ना कर्जाची परतफेड करु शकत ना वर्षभर उदरनिर्वाह करु शकत. ही गंभीर समस्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर पडली. याबाबद चौकशी करुन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पवनारा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार सोनवाने यांना केली. (वार्ताहर)