शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सिंचन सुविधांमुळे कोरडवाहू पट्ट्यात उसाची मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST

युवराज गोमासे करडी(पालोरा):- सिंचनाच्या साधनांमुळे दगडावरही चांगली शेती करता येते. ग्रामीण भागात ''''पाणी त्याची बाणी'''', असे म्हटले जाते. कोरडवाहू ...

युवराज गोमासे

करडी(पालोरा):- सिंचनाच्या साधनांमुळे दगडावरही चांगली शेती करता येते. ग्रामीण भागात ''''पाणी त्याची बाणी'''', असे म्हटले जाते. कोरडवाहू करडी परिसरात चार वर्षात जलसंधारणांच्या कामांमुळे आज परिस्थिती पालटली आहे. परिणामी उन्हाळ्यातील कोरडे माळरान आता हिरवेगार दिसू लागले आहेत. एका पाण्याचा दुष्काळ बऱ्याच अंशी संपला. जलस्रोतात व साठवणूक क्षमतेत तसेच भूजल साठ्यात वाढ होऊन धानाच्या पट्ट्यात आता उसाने दुपटीने मुसंडी मारली आहे. बागायती क्षेत्रातही वाढ झाली आहे.

कोरडवाहू करडी परिसरात २७ लहान मोठ्या तलावांची संख्या असताना सिंचन क्षमता बेताची होती. ''''जलयुक्त शिवार योजनेने यातील बहुतेक तलावांचे खोलीकरण चार वर्षात झाले. नविन बंधारे व तुटलेल्या बंधाऱ्यांची दुरूस्ती झाली. शेततळे खोदल्या गेले. नाल्यांचा उथळपणा निघून खोल झाले. जलसाठ्यात भरीव वाढ झाल्याने विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याने उसाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली. हेक्टरी उत्पादन ६० ते ६५ टनांपर्यंत पोहचले आहे.

करडी परिसरात जिल्ह्यातील एकमेव मानस साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला प्रारंभ झाला आहे. वैनगंगेच्या खोऱ्यात काळ्या कसदार सुपीक शेतीचे वरदान शेतकऱ्यांना मिळाले आहे. मात्र, सिंचनाच्या साधनांअभावी व पाण्याचे योम्य नियोजन, व्यवस्थापन तसेच साठवणुकी अभावी पावसाचे पाणी आले तसे नदीला, नाल्यांना वाहून जायचे. परिपक्व अवस्थेत आलेले धानाचे पीक एका पाण्याने वाया जायचे.

करडी परिसरातील गावात जलसाठवणुकीचे लघु व सूक्ष्म सिंचनाचे जाळे जलयुक्त शिवार योजनेमुळे विणले गेले. परिणामी गावात धानाशिवाय अन्य पिके घेतली जात नव्हती. परंतु सिंचनाची साधने निर्माण झाल्याने कोरडवाहू पालोरा, जांभोरा, किसनपूर, खडकी, पांजरा, बोरी, करडी, नवेगाव, मोहगाव आदी गावात चार वर्षात उसाच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली. ड्रीप व मल्चींगवर आधारीत बागायती शेती क्षेत्रातही बाढ होताना दिसत आहे.

बॉक्स

ऊस क्षेत्रात अशी झाली भरीव वाढ

शासनाच्या जलयुक्त शिवार येजनेची मोठी साथ कोरडवाह पट्ट्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. मोहाडी तालुक्यात सन २०१५-१६ ते २०१८-१९ या तीन वर्षात ३३ गावात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या काममुळे काटी पिकांना उपयुक्त साथ लाभली आहे. तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये उसाचे क्षेत्र ४५० हेक्टर होते. २०१६-१७ मध्ये उसाच्या क्षेत्रात वाढ होऊन ती ६२३.४८ हेक्टर वर पोहचली तर सन २०१७-१८ मध्ये उसाचे क्षेत्र ८४.०७ हेक्टर आर पर्यंत पोहचले आहे. सन २०१८-१९ व २०१९-२० वर्षात वाढ कायम राहिली आहे.