शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाचा फटका

By admin | Updated: May 29, 2017 00:11 IST

शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला.

ठिकठिकाणी नुकसान : दोन दिवस तूर खरेदी बंद, वृक्ष उन्मळली; वीजपुरवठा खंडितलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार/ नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये विक्रीस असलेली तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. नांदगावच्या बाजार समितीत नाफेडने खरेदी केलेली तूर ओलीचिंब झाली. अनेक शेतकऱ्यांच्या बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात असलेल्या तुरीच्या गंजीखाली पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे दोन दिवस तूर खरेदी बंद असल्याने महिनाभरापासून तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी दोन दिवस तूर मोजणीसाठी थांबावे लागणार आहे.बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना जागेअभावी बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात तूर ठेवावी लागली. ज्या तुरीच्या गंजींना ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते. अशा गंजीच्या खालून पानी वाहिल्याने नुकसान झाले. चांदूरबाजार तालुक्यात लाखनवाडी, आसरा या गावांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. वादळाचा वेग अधिक असल्याने नुकसान झाले. लाखनवाडी गावात नागरिकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले. विजेचे तार तुटून पडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. विजेचे चार पोल व अनेक वृक्ष कोलमडून पडले. या घटनेची माहिती मिळताच नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांनी पीक नुकसानीचा पंचानामा केला. चांदूरबाजार तालुक्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्यात वादळी पावसामुळे मोठी झाडे कोसळली व वीजपुरवठा खंडित झाला. तिवसा येथील बाजार समितीमध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर मोजणी बंद करण्यात आल्याने व त्यावर ताडपत्री झाकून ठेवल्याने मोठे नुकसान टळले. मोशी तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडला. मात्र आसपासच्या परिसरात वादळी पावसाची माहिती मिळाल्याने नागरिक सजग होते. कांदा पिकाला नुकसान अकाळी पावसामुळे बाजार समितीच्या यार्डात ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले. शेतातील उभ्या कादा पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची रस्त्यावर विक्री करीत आहेत. मात्र कांदा ओला झाल्याने तो सडण्याची शक्यता असून त्याचा भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.