शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

अभ्यास करा... अन् मिळवा विमान प्रवासाची संधी

By admin | Updated: December 15, 2015 00:41 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात खूप पुढे जावे, मोठे अधिकारी बनावे.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम : मोहाडीतील सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकारराजू बांते मोहाडीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात खूप पुढे जावे, मोठे अधिकारी बनावे. याशिवाय अभ्यासात अधिक लक्ष देऊन शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी या हेतूने प्रेरित झालेले मोहाडीतील सामाजिक कार्यकर्ते बाबू दिपटे यांनी ‘करा अभ्यास अन् जिंका विमान प्रवास’ अशी प्रेरणादायी योजना सुरु केली आहे.ग्रामीण भागात शिक्षणाबाबत अजूनही सकारात्मक विचार दिसून येत नाही. प्रवाहासोबत जाताना ग्रामीण भागातील विद्यार्थी अन् त्यांचे पालक शिक्षणाला प्राधान्य देत नाही. शिक्षण घेऊन नोकरी लागते कां?, कलेक्टर बनायचे आहे का?, शिकून करायचं काय? आदी नकारात्म्क प्रश्नांनी ग्रामीण भागातील पालकांमध्ये घर केले आहे. ही नकारात्मक मानसिकता दूर व्हावी, अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये स्पर्धा निर्माण करावी हा दृष्टिकोन बाळगून बाबू दिपटे यांनी ‘करा अभ्यास अन् जिंका विमान प्रवास’ अशा प्रकारचा तालुका गौरव पुरस्कार यावर्षीपासून कार्यान्वित केला आहे. या गौरव पुरस्कारात मोहाडी, तुमसर, तिरोडा या तालुक्यातील खाजगी, जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातून १० व १२ वीमधून पहिला व दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यास नागपूर- मुंबई असा मोफत प्रवास मुंबई दर्शन आणि वातानुकूलीत रेल्वेच्या डब्यातून परतीचा प्रवास करण्याची योजना आखली आहे. हे गुणवंत विद्यार्थी परतून आल्यावर त्यांच्यासाठी मोहाडी येथे प्रेरणा कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या प्रेरणा कार्यशाळेत तालुक्यातून १० वी, १२ वीत प्रथम, द्वितीय विद्यार्थीखेरीज तालुक्यातील पहिले पाच गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा समावेश करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला उद्बोधन करण्यासाठी आयएएस, आयपीएस तसेच ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले व उच्च पदावर गेले, अशा अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करा... या योजनेत झोकून द्यावे, विद्यार्थ्यांनी या योजनेतून प्रेरणा घ्यावी, यासाठी बाबू दिपटे यांनी मोहाडी, तुमसर, तिरोडा येथील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. जे उपक्रम शिक्षण विभागाने किंवा मुख्याध्यापकांनी राबवावे अशी अपेक्षा असताना एका सामाजिक कार्यकर्त्यांने शैक्षणिक वातावरण निर्माण करुन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड आणि जिद्द निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचे जीवन शिक्षणातून समृध्द व्हावे यासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये जेवढा वाटा शिक्षक, पालकांचा असतो याशिवाय समाजाचा सक्रीय सहभाग असेल तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडू शकते, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे बाबू दिपटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.