शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अभ्यास करा... अन् मिळवा विमान प्रवासाची संधी

By admin | Updated: December 15, 2015 00:41 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात खूप पुढे जावे, मोठे अधिकारी बनावे.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम : मोहाडीतील सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकारराजू बांते मोहाडीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात खूप पुढे जावे, मोठे अधिकारी बनावे. याशिवाय अभ्यासात अधिक लक्ष देऊन शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी या हेतूने प्रेरित झालेले मोहाडीतील सामाजिक कार्यकर्ते बाबू दिपटे यांनी ‘करा अभ्यास अन् जिंका विमान प्रवास’ अशी प्रेरणादायी योजना सुरु केली आहे.ग्रामीण भागात शिक्षणाबाबत अजूनही सकारात्मक विचार दिसून येत नाही. प्रवाहासोबत जाताना ग्रामीण भागातील विद्यार्थी अन् त्यांचे पालक शिक्षणाला प्राधान्य देत नाही. शिक्षण घेऊन नोकरी लागते कां?, कलेक्टर बनायचे आहे का?, शिकून करायचं काय? आदी नकारात्म्क प्रश्नांनी ग्रामीण भागातील पालकांमध्ये घर केले आहे. ही नकारात्मक मानसिकता दूर व्हावी, अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये स्पर्धा निर्माण करावी हा दृष्टिकोन बाळगून बाबू दिपटे यांनी ‘करा अभ्यास अन् जिंका विमान प्रवास’ अशा प्रकारचा तालुका गौरव पुरस्कार यावर्षीपासून कार्यान्वित केला आहे. या गौरव पुरस्कारात मोहाडी, तुमसर, तिरोडा या तालुक्यातील खाजगी, जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातून १० व १२ वीमधून पहिला व दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यास नागपूर- मुंबई असा मोफत प्रवास मुंबई दर्शन आणि वातानुकूलीत रेल्वेच्या डब्यातून परतीचा प्रवास करण्याची योजना आखली आहे. हे गुणवंत विद्यार्थी परतून आल्यावर त्यांच्यासाठी मोहाडी येथे प्रेरणा कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या प्रेरणा कार्यशाळेत तालुक्यातून १० वी, १२ वीत प्रथम, द्वितीय विद्यार्थीखेरीज तालुक्यातील पहिले पाच गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा समावेश करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला उद्बोधन करण्यासाठी आयएएस, आयपीएस तसेच ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले व उच्च पदावर गेले, अशा अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करा... या योजनेत झोकून द्यावे, विद्यार्थ्यांनी या योजनेतून प्रेरणा घ्यावी, यासाठी बाबू दिपटे यांनी मोहाडी, तुमसर, तिरोडा येथील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. जे उपक्रम शिक्षण विभागाने किंवा मुख्याध्यापकांनी राबवावे अशी अपेक्षा असताना एका सामाजिक कार्यकर्त्यांने शैक्षणिक वातावरण निर्माण करुन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड आणि जिद्द निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचे जीवन शिक्षणातून समृध्द व्हावे यासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये जेवढा वाटा शिक्षक, पालकांचा असतो याशिवाय समाजाचा सक्रीय सहभाग असेल तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडू शकते, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे बाबू दिपटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.