शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळीच्या वरणाला ‘मुकले’ विद्यार्थी

By admin | Updated: January 3, 2016 01:14 IST

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सकस आहार मिळावा, या उद्देशाने शाळांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्यात येतो.

शालेय पोषण आहारतील प्रकार : मूग डाळीचा होतोय पुरवठा, पुरवठा होणारे धान्य निकृष्टप्रशांत देसाई भंडाराइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सकस आहार मिळावा, या उद्देशाने शाळांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र, मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील शाळांना तूर डाळीचा होणारा पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्याऐवजी मूग डाळीचे वाटप होत असून तेही अत्यल्प होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत उच्च दर्जाचे शिक्षण देणे व त्यासोबतच विद्यार्थ्यांमधील कुपोषणावर आळा बसावा यासाठी शालेय पोषण आहारचा पुरवठा करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सध्या हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना ‘प्रोटीनयुक्त’ आहाराऐवजी निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासन सर्वसामान्यांना स्वस्त तूरडाळ देण्याचा दावा करत असतानाच शालेय पोषण आहारातून तूर डाळ महागाईमुळे गायब झाली आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी आलेल्या शालेय पोषण आहाराच्या कोट्यात तूर डाळच नाही. त्यामुळे वरणभातापासून शालेय विद्यार्थी वंचित झाले आहेत.जिल्ह्यातील शाळांना आॅक्टोंबर महिन्यापासून पोषण आहारासाठी ते धान्य पुरविण्यात आले. त्यात तूर डाळीचा प्रस्तावच नाही. महागाईमुळे तूर डाळ देण्यात आली नसल्याची माहिती आहे. परंतु तूर डाळ वजा करताना त्याऐवजी मुग डाळीचा अत्यल्प पुरवठा करण्यात आला. परंतु तूर डाळीच्या वरणासोबत भात खाणारे विद्यार्थी मूग डाळीकडे बघायला तयार नाहीत. त्यामुळे शालेय पोषण आहार शिजविणाऱ्यांसाठी चांगलीच अडचण झाली आहे. प्रशासनाने आठवड्याचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार सोमवारी विद्यार्थ्यांना तूर डाळीचे वरण देणे बंधनकारक आहे. सोमवारी तूरडाळ मंगळवारी वाटाणे, बुधवारी मूगडाळ, गुरूवारी वाटाणे, शुक्रवारी चवळी, शनिवारी वाटाणे देण्याचा शिरस्ता आॅक्टोंबरपर्यत कायम होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात शालेय पोषण आहाराच्या कोट्यात तूरडाळच न आल्याने सोमवारच्या आहारात काय द्यावे हा प्रश्न आहे. नाईलाजाने शिक्षक दररोजच्या आहारात विद्यार्थ्यांना मूग डाळ देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वरण भाताचे आहारापासून वंचित राहावे लागत आहेत. बाजारपेठेत तूर डाळीचे किरकोळ विक्रीचे दर सध्या १८० ते २०० रूपये किलोप्रमाणे आहेत. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेले आहेत. भंडारा धान उत्पादक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुरवठा होणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहेत. पुरवठा होणारी मुग डाळ आवश्यकतेनुसार न मिळता कमी मिळत आहे. शिजत नसलेला वाटाणा व बुबुळ लागलेल्या चवळीचा पुरवठा होत असल्याची शिक्षकांची ओरड आहे. नोव्हेंबरला धान्य मिळाले होते. जानेवारीतही डिसेंबरचे धान्य मिळाले नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार साहित्य संपल्याने शाळेतील आहार शिजविणे बंद झाले असून विद्यार्थी घरूनच माध्यान्ह भोजनाचे टिफिन आणत आहेत.मागील तीन महिन्यांपासून तूर डाळीचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे तूर डाळीचे वरण विद्यार्थ्यांना दुरापस्त झाले आहे. सोबतच पुरवठा होणारा धान्य निकृष्ट असते. पोषण आहाराबाबत शिक्षकांवरच खापर फोडण्यात येत असल्याचा आरोप राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केला आहे.