शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परीक्षा शुल्काच्या नावाखाली कांद्री प्रशासकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:59 IST

विद्यार्थ्यांची पिळवणूक : विद्यापीठाने ठरविल्यापेक्षा घेतले जाते अतिरिक्त शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्क आंधळगाव : विद्यापीठाने परीक्षा क्षुल्क निर्धारित केले असले तरी, मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील श्री संत गजानन प्रशासकीय महाविद्यालयात अतिरिक्त शुल्क घेऊन विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. अतिरिक्त शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांची टीसी अडवून त्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात असल्याचाही प्रकार येथे पुढे आला आहे.

कांद्रीतील प्रशासकीय महाविद्यालय कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाशी संलग्नित आहे. या महाविद्यालयात परिसरातील गरीबघरची मुले शिकतात. अनेकांची आर्थिक स्थिती बेताची असतानाही अतिरिक्त शुल्कासाठी येथील प्राचार्य आणि लिपिक दबाव आणतात, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. २०१८-१९ पासून हे महाविद्यालय येथे सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क ६०० रुपये ठेवण्यात आले आहे; परंतु येथे विद्यार्थ्यांकडून ७०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना बळजबरी केली जाते. अतिरिक्त घेतल्या जाणाऱ्या १०० रुपयांची नोंद कुठेच नसते. यासंदर्भात महाविद्यालयाची बाजू ऐकण्यासाठी प्राचार्य प्रशांत वासनिक आणि संबंधित लिपिकाशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

२२ विद्यार्थ्यांचे कॉपी प्रकरण ताजेच याच महाविद्यालयातील प्रथम वर्षांच्या हिवाळी परीक्षेच्या अखेरच्या पेपरला चवक परीक्षागृहात मोबाइल घेऊन पेपर सोडविल्याचा प्रकार ताजा आहे. या प्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या भरारी पथकाने कारवाईही केली आहे. याच महाविद्यालयाचे प्राचार्य केंद्राध्यक्ष असताना त्यांच्या उपस्थितीतच हा गैरप्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांसोबत आर्थिक व्यवहार करून हा प्रकार घडल्याने संस्थाचालक या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबद्दल शिक्षणक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिष्यवृत्तीच्या २४ हजारांसाठी टीसी अडविलीयाच महाविद्यालयात बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण करूनही टीसी न दिल्याने रत्नदीप सूर्यवंशी नामक विद्यार्थ्यांला पुढील शिक्षणापासून मुकावे लागल्याचा प्रकार घडला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात रत्नदीपने या महाविद्यालयातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याला मिळणार असलेली शिष्यवृत्ती विद्यापीठाकडून खात्यात न आल्याने त्याला महाविद्यालयाने टीसी दिलीच नाही. आधी २४ हजार रुपये जमा करून नंतर टीसी घेऊन जाण्यास महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. अखेर या विद्यार्थ्याला वर्षभर शिक्षणापासून वंचित राहावे लागल्याची कैफियत त्याने 'लोकमत' जवळ मांडली. 

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षण