शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी उपाशी

By admin | Updated: October 15, 2016 00:31 IST

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मूलांच्या वसतीगृहातील स्वयंपाकाचा सिलिंडर संपल्याने ...

१५ विद्यार्थी स्वगृही रवाना : स्वयंपाकाचा सिलिंडर संपला, सोमवारपासून परीक्षातुमसर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मूलांच्या वसतीगृहातील स्वयंपाकाचा सिलिंडर संपल्याने सुमारे ३५ विद्यार्थ्यांना सकाळच्या केवळ नाशता देण्यात आला. उर्वरित दिवसभर त्यांना उपाशी राहावे लागले. ३५ पैकी १५ विद्यार्थी स्वगृही शुक्रवारी रवाना झाले. सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु होत आहेत. समाजकल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसरात शासनाने गरीब, आर्थिकदृष्टया मागासलेल्या विद्यार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मूलांचे शासकीय वसतीगृह सुरु केले. शुक्रवारी येथील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता दिला. त्यानंतर स्वयंपाकाचा सिलिंडर संपला असे सांगण्यात आले. सकाळी १० चे भोजन तयार करण्यात आले नाही. सर्व वसतीगृहातील विद्यार्थी सकाळच्या नाश्त्यावर दिवसभर होते. भुकेने व्याकूळ झालेल्या सुमारे १५ विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला.वसतीगृह प्रशासनाने या विद्यार्थ्यांना स्वगृही जाण्यास सांगितल्याची माहिती आहे. सोमवारपासून येथील विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु होत आहेत. तर वर्ग ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा सुरु झाली आहे. हे विशेष. वसतीगृह प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर येण्याच्या सूचना दिल्याची माहिती एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला दिली. सदर वसतीगृह भाड्याच्या इमारतीत सुरु असून नगरपरिषदेच्या कर थकीत प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी वसतीगृहाचे कार्यालयाला सील ठोकली होती. या वसतीगृह इमारतीवर ४ लक्ष ७७ हजार ६४० रुपये इतके कर थकीत आहे. समाजकल्याण विभागाचे अधिकारी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर एकदाही या वसतीगृहाला भेट दिली नाही. अशी माहिती आहे. या वसतीगृहाची ७५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. सध्या केवळ ३५ विद्यार्थी वसतीगृहात वास्तव्याला आहेत. शैक्षणिक सत्र सुरु होऊन तीन महिन्याच्या कालावधी झाला तरी प्रवेश प्रक्रिया अजूनपर्यंत झाली नाही. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया येथे संबंधित विभाग राबविते. संगणक युगात व नियमांची पारदर्शीपणाचा आधार घेणारे समाजकल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे. या वस्तीगृहाचा कारभार एक कनिष्ठ लिपीक सांभाळतांना दिसतात हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)स्वयंकाचा सिलिंडर संपल्यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. दूपारी नविन सिलिंडर आणला. विद्यार्थ्यांना स्वगृही जाण्यास सांगितले नाही. विद्यार्थ्यांना पोटभर अन्न खाऊ घालण्यात येणार आहे. - टी.जी. कांबळे, कनिष्ठ लिपीकआंबेडकर मागासवर्गीय वसतीगृह, तुमसर