शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विद्यार्थीच राष्ट्र निर्माण करू शकतात

By admin | Updated: January 3, 2015 00:42 IST

विद्यार्थी जीवनात झालेले संस्कारच पुढे आयुष्य घडवण्यास उपयोगी ठरतात. शिक्षणासोबतच सुसंस्कृतपणा अंगी यायला हवा. शालेय शिक्षणामधूनच व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे,...

साकोली : विद्यार्थी जीवनात झालेले संस्कारच पुढे आयुष्य घडवण्यास उपयोगी ठरतात. शिक्षणासोबतच सुसंस्कृतपणा अंगी यायला हवा. शालेय शिक्षणामधूनच व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश काशीवार यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल, साकोलीच्या द्विदिवसीय वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती श्रावण बोरकर हे होते. अतिथी म्हणून शाळा समिती अध्यक्षा गीता कापगते यांनी वार्षिकोत्सव कार्यक्रमातून वक्तृत्व व नेतृत्व गुण वाढीला लागतील. आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर तर झाला पाहिजे, पण त्यातून माणूसपणही जोपासले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. अ‍ॅड. दिलीप कातोरे म्हणाले, परीक्षेत पास होेणे महत्वाचे नाही तर जीवनाच्या परीक्षेत पास होण्यासाठी सर्वांगिण प्रगती महत्वाची आहे. शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार, श्याम शिवणकर यांनी शाळेत सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची प्रशंसा केली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या जया भुरे, शिक्षक पालक संघाचे कैलास गेडाम व बबिता भजे उपस्थित होते.बक्षीस वितरण समारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, उच्च श्रेणी खंड विकास अधिकारी व्ही.टी. बोरकर, गटशिक्षणाधिकारी जी.के. फटिंग, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बावणकुळे, लक्ष्मीनारायण विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरूषोत्तम गुंगमोडे, माजी मुख्याध्यापक सलीम अन्सारी यांचे उपस्थितीत पार पडला. संचालन अशोक रंगारी यांनी तर आभारप्रदर्शन अरुण पारधी व उमेश चोले यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक पारधी, भानारकर, चोले, मोहबंशी, अतकरी, भानारकर, खोब्रागडे, येडे, लंजे, खोब्रागडे, जनबंधू यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)