शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बसफेरी बदलाचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:20 IST

ग्रामीण भागातून शाळेत शिकणारे विद्यार्थी एसटीने प्रवास करण्यासाठी पास काढतात. विद्यार्थ्यांकडून पासचे पैसे घेऊन परिवहन मंडळ प्रवासाकरीता बसची सेवा वेळेत देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांकडे शुक्रवारी रात्री केली.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील प्रकार : बससेवा पुरविण्याची मागणी

ऑनलाईन लोकमततुमसर : ग्रामीण भागातून शाळेत शिकणारे विद्यार्थी एसटीने प्रवास करण्यासाठी पास काढतात. विद्यार्थ्यांकडून पासचे पैसे घेऊन परिवहन मंडळ प्रवासाकरीता बसची सेवा वेळेत देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांकडे शुक्रवारी रात्री केली.तुमसर बसस्थानकावर शेकडो विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव केला. शाळेत जाण्याकरीता व घरी जाण्यास नित्यनेमाने उशिर होतो. कधी रात्रीचे ७ वाजता तर कधी आठ वाजतात. घरचे चिंताग्रस्त होऊन वाट पाहतात, अभ्यास बुडतो, शिक्षणाचा प्रश्न येरणीवर आला असल्याचे विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांना यापूर्वीही सांगितले आहे. बस स्थानकावर सर्वत्र अंधार राहत असल्यामुळे काही अनुचीत घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न मुलांनी उपस्थित केला.विद्यार्थ्यांच्या असुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आमदार अनिल बावनकर व सितेपारचे सरपंच गजानन लांजेवार यांनी त्याचक्षणी थेट बसस्थानक गाठले. रात्रीचे ७.३० वाजुनही स्थानकावर शेकडो मुलामुलींची गर्दी व बसस्थानकावर एकही बस का नाही. अशी विचारणा बावनकर यांनी आगारप्रमुखांना केली. मानव विकास योजनेअंतर्गत गावागावातील शाळकरी मुलांना ये-जा करण्याकरीता बसेसची सुविधा असतानाही हा गोंधळ का निर्माण होतो. या बावनकर यांच्या प्रश्नावर आगारप्रमुख निरूत्तर झाले.दिवाळीपूर्वी बसने प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत नव्हता परंतु बसच्या फेºयांमध्ये फेरबदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना वेळीच सुविधा पुरविण्यात आल्या नाही तर आंदोलन करण्याचा ईशारा माजी आमदार अनिल बावनकर यांनी दिला आहे.शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तालुक्यातील खापा, परसवाडा, पिपरीचुन्नी, देवरीदेव, बपेरा, बघेडा, गोबरवाही, लोभी या मार्गाहुन बसने शाळा शिकणारे विद्यार्थी प्रवास करतात. याच मार्गावरील बस फेºयांमध्ये बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा करून गावी परत जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटीच्या येण्याजाण्याच्या वेळेत तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सकाळी ९.३० ला येणारी बस कधी ११ तर कधी १२ वाजता येते. परिणामी वर्ग बुडतात. त्यामुळे शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. पैसे खर्च करून परिवहन मंडळातुन काढलेल्या विद्यार्थी पासचा कसलाच उपयोग होत नसल्याचे त्यांनी आगार व्यवस्थापकांना सांगितले. लाल रंगाच्या बसेसमध्ये विद्यार्थी पास असलेल्या विद्यार्थ्यांना बसून देत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना पर्यायी सुविधा देण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून समस्येचे निराकरण करण्याची ग्वाही आगारप्रमुख उजवणे यांनी दिली आहे.