शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

मतदान जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग

By admin | Updated: October 13, 2014 23:19 IST

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा जिल्हा (७२.२१ टक्के) मतदानाच्या टक्केवारीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती

भंडारा : एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा जिल्हा (७२.२१ टक्के) मतदानाच्या टक्केवारीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महविद्यालयाचा विद्यार्थी आशिष ठाकरे हा अव्वल ठरला. जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धांचे निकाल जाहिर करण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या निबंधाचा हा काही अंश...मतदान आवर्जुन करानिवडणुकीची रणधुमाळी ंअंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे. काहीही करून जिंकून यायचे वेड प्रत्येकच उमेदवाराला लागले आहे. परंतु मतदारांनी न चुकता मतदान करावी, अशी अपेक्षा आहे. सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे खोट्या प्रचाराला बळी न पडता आपले अमूल्य मत, कर्तबगार व्यक्तीला द्या. कारण एखादा उमेदवार क्षेत्राचा उद्धार करू शकतो. अशाच माणसाच्या हाती राज्याची धुरा दिली पाहिजे, असे माझे मत आहे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सत्ता मिळवायची परंतु ते विचार रुजविण्याचा प्रयत्न कोणताही पक्ष करीत नाही. गांधीजींच्या तत्वांचा आणि घटनात्मक मुल्यांचा जीवनात आग्रह धरलेला नाही. त्यामुळे आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत. तेच आपल्याला कळत नाही. माणसाने पुस्तक वाचले तर त्याचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणासमोरही नतमस्तक होत नाही. हा वसा आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आज मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनदेखील प्रयत्न करीत आहे परंतू काही ठिकाणी अजूनही ३५-४० टक्केच मतदान होत आहे. मतदान करणारा मतदार जर संघटीत होऊन, एकत्रित येऊन आणि विचार करून मतदान करत असेल तर तो या देशात निर्माण होणाऱ्या समस्या सट्टा, जुगार, दारू, भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, हुंडाबळी, महिलांवरील होणारे अत्याचार या गोष्टी थांबविणे हे मतदारांच्या हातात आहेत. सुजान मतदार हाच देशाला सुजलाम, सुफलाम करु शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तरच उद्याचा उष:काल तुमच्या हातात आहे’ अन्यथा नाही. बाबासाहेबांनी पुन्हा म्हटले होते की ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. तेव्हाच तो बंड करून उठेल’. गुलामाला त्याच्याविरूद्ध होणाऱ्या अन्यायाची माहिती मिळाली तर तो अन्यायाविरूद्ध लढू शकतो, असे मला वाटते.