शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या सांजवेळी निवाऱ्यासाठी धडपड

By admin | Updated: January 5, 2016 00:34 IST

अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी लोकशाही देशात त्या टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र त्याची एक निश्चित मर्यादा असावी.

पवनी : अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी लोकशाही देशात त्या टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र त्याची एक निश्चित मर्यादा असावी. परंतु पवनी येथील एका वृद्धेच्या नशिबी निवाऱ्याची सोय मागील पाच दशकांपासून अपुरी आहे. शासनाचे उंबरठे झिजवूनही तिला व तिच्या मुलासाठी हक्काचे घरकुल मिळालेले नाही. बसंती परसराम मेश्राम रा.शुक्रवारी वॉर्ड असे या महिलेचे नाव आहे.बसंती मेश्राम यांचे सासरकडील मंडळी मागील पाच दशकांपासून उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. सदर वृद्धेचे पती परसराम हे विमनस्क असल्याचे नागरिक सांगतात. कधी वाजंत्री वाजवून तर कधी भिक्षा मागून तर कधी कपड्यांची तुरपाई करून कुटुंबाचा गाढा ते ओढत होते. एके दिवशी आझाद चौक येथील एका भिंतीच्या आडोशाला परसराम बसले असताना ती भिंत कोसळली. त्याच ढिगाऱ्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्याचे काहींनी प्रयत्नही केले. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. बसंती या वृद्ध महिलेवर आभाळ कोसळले. परसराम यांची अंत्ययात्रा व तेरवीचा कार्यक्रम पैसे गोळा करून आटोपण्यात आला. दुसरीकडे मतीमंद मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी बसंतीच्या खांद्यावर आली. पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने बसंती यांना शासकीय मदत मिळावी यासाठी वॉर्डातील प्रा.उषाकिरण सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले. मात्र शिधापत्रिका, मुलाचे मतदान ओळखपत्र व बिपीएल क्रमांक नसल्याने अपघात निधी मिळण्यास अडचण निर्माण झाली. आजही तो निधी मिळालेला नाही. संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मागील दीड वर्षांपासून तहसील कार्यालयात धुळखात आहे. घरकुल मिळावे यासाठी बसंती मेश्राम यांचा संघर्ष पाच वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)दिवसातून एकदाच पेटते चूलउघड्यावर पडलेल्या काड्या व लाकूड वेचून दिवसातून एकदा चुल पेटते. वृद्धेचा मुलगा अल्पमजुरीत काम करतो. वॉर्डाबाहेर काही इसम मायलेकाला चिडवीत असल्याने दोघेही वॉर्डाबाहेर जात नाही. जेवण केल्यावर वॉर्डातील ज्ञानांकुर बौद्धविहार येथील टिनाच्या पत्र्याखाली आसरा घेतात. घरकुल नसल्याने पावसाळ्यात पाण्याची झडप, हिवाळ्यात बोचरी थंडी व उन्हाळ्यात उकाड्याचे चटके सहन करावे लागतात. शासन गरीबांसाठी अनेक योजना राबवित असले तरी ती योजना बसंतीसाठी नाही काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सेवाभावी संस्था, समाजसेवक, लोकप्रतिनिधी बसंती नामक या वृद्धेची व्यथा आत्मसात करून मदत करतील काय? अशी अपेक्षा आहे.