शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा वज्र्राघात ; सुधारित आणेवारी ६२ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:55 IST

कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे.

ठळक मुद्देजावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचा प्रयत्न

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारीत आणेवारी ^६२ पैसे घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी नसल्याची बाब उघड झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही भंडारा जिल्हा प्रशासनाने एक महिन्यापूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केलेली होती.खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या हंगामी आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी असलेले पडीत क्षेत्र, कमी पर्जन्यमान, परतीच्या पावसात वादळी वाºयाने केलेले नुकसान याचा अंदाज घेवून सुधारीत आणेवारीत फायदा होईल, अशी शेतकºयांची आस होती. परंतू जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा जावईशोध लावीत शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखविण्यात आली होती. दुसरीकडे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी विचारू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची सुधारीत पैसेवारी ६२ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावांचा समावेश नाही. शेतातील बांध्यांमध्ये पाणीच पडले नाही तर धान्य कसे उगवणार? क्षेत्राची आणेवारी जास्त कशी? असेही शेतकरी बोलून दाखवित आहेत.३३ टक्के पाऊस बरसला कमीमान्सून काळात जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी इतका सरासरी पाऊस बसरतो. यावषी १ जून ते ३१ आॅक्टोबर ार्यंत सरासरी पावसापेक्षा ३३ टक्के पाऊस कमी बरसला. विशेष म्हणजे मागील वर्षी म्हणजेच सन २०१६-१७ या वर्षात पावसाची टक्केवारी ७६ इतकी होती. यावेळी मात्र मागील वर्षीच्या तुननेत ९ टक्के पाऊस कमी म्हणजे ६७ टक्केच बरसला. आधीच कमी पर्जन्यमान , धानावर रोगाचे आक्रमण, सिंचनाच्या अपुºया सुविधा यामुळे बळीराजा त्रस्त असताना सुधारीत आणेवारीतही प्रशासनाने ठेंगा दाखविला काय? असे म्हणने वावगे ठरणार नाही.अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी५० पैसांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची सुधारीत पैसेवारी ५९ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ६३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ६७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५७ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६० पैसे दाखविण्यात आली आहे. रब्बीच्या १४ गावांची पैसेवारी स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येणार आहे.