शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

प्रशासनाचा वज्र्राघात ; सुधारित आणेवारी ६२ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:55 IST

कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे.

ठळक मुद्देजावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचा प्रयत्न

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारीत आणेवारी ^६२ पैसे घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी नसल्याची बाब उघड झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही भंडारा जिल्हा प्रशासनाने एक महिन्यापूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केलेली होती.खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या हंगामी आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी असलेले पडीत क्षेत्र, कमी पर्जन्यमान, परतीच्या पावसात वादळी वाºयाने केलेले नुकसान याचा अंदाज घेवून सुधारीत आणेवारीत फायदा होईल, अशी शेतकºयांची आस होती. परंतू जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा जावईशोध लावीत शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखविण्यात आली होती. दुसरीकडे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी विचारू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची सुधारीत पैसेवारी ६२ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावांचा समावेश नाही. शेतातील बांध्यांमध्ये पाणीच पडले नाही तर धान्य कसे उगवणार? क्षेत्राची आणेवारी जास्त कशी? असेही शेतकरी बोलून दाखवित आहेत.३३ टक्के पाऊस बरसला कमीमान्सून काळात जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी इतका सरासरी पाऊस बसरतो. यावषी १ जून ते ३१ आॅक्टोबर ार्यंत सरासरी पावसापेक्षा ३३ टक्के पाऊस कमी बरसला. विशेष म्हणजे मागील वर्षी म्हणजेच सन २०१६-१७ या वर्षात पावसाची टक्केवारी ७६ इतकी होती. यावेळी मात्र मागील वर्षीच्या तुननेत ९ टक्के पाऊस कमी म्हणजे ६७ टक्केच बरसला. आधीच कमी पर्जन्यमान , धानावर रोगाचे आक्रमण, सिंचनाच्या अपुºया सुविधा यामुळे बळीराजा त्रस्त असताना सुधारीत आणेवारीतही प्रशासनाने ठेंगा दाखविला काय? असे म्हणने वावगे ठरणार नाही.अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी५० पैसांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची सुधारीत पैसेवारी ५९ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ६३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ६७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५७ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६० पैसे दाखविण्यात आली आहे. रब्बीच्या १४ गावांची पैसेवारी स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येणार आहे.