शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

प्रशासनाचा वज्र्राघात ; सुधारित आणेवारी ६२ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:55 IST

कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे.

ठळक मुद्देजावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचा प्रयत्न

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारीत आणेवारी ^६२ पैसे घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी नसल्याची बाब उघड झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही भंडारा जिल्हा प्रशासनाने एक महिन्यापूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केलेली होती.खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या हंगामी आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी असलेले पडीत क्षेत्र, कमी पर्जन्यमान, परतीच्या पावसात वादळी वाºयाने केलेले नुकसान याचा अंदाज घेवून सुधारीत आणेवारीत फायदा होईल, अशी शेतकºयांची आस होती. परंतू जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा जावईशोध लावीत शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखविण्यात आली होती. दुसरीकडे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी विचारू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची सुधारीत पैसेवारी ६२ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावांचा समावेश नाही. शेतातील बांध्यांमध्ये पाणीच पडले नाही तर धान्य कसे उगवणार? क्षेत्राची आणेवारी जास्त कशी? असेही शेतकरी बोलून दाखवित आहेत.३३ टक्के पाऊस बरसला कमीमान्सून काळात जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी इतका सरासरी पाऊस बसरतो. यावषी १ जून ते ३१ आॅक्टोबर ार्यंत सरासरी पावसापेक्षा ३३ टक्के पाऊस कमी बरसला. विशेष म्हणजे मागील वर्षी म्हणजेच सन २०१६-१७ या वर्षात पावसाची टक्केवारी ७६ इतकी होती. यावेळी मात्र मागील वर्षीच्या तुननेत ९ टक्के पाऊस कमी म्हणजे ६७ टक्केच बरसला. आधीच कमी पर्जन्यमान , धानावर रोगाचे आक्रमण, सिंचनाच्या अपुºया सुविधा यामुळे बळीराजा त्रस्त असताना सुधारीत आणेवारीतही प्रशासनाने ठेंगा दाखविला काय? असे म्हणने वावगे ठरणार नाही.अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी५० पैसांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची सुधारीत पैसेवारी ५९ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ६३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ६७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५७ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६० पैसे दाखविण्यात आली आहे. रब्बीच्या १४ गावांची पैसेवारी स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येणार आहे.