शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

स्वच्छतेची चळवळ बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:09 PM

नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी व आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता ही सेवा.....

ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : स्वच्छता ही सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी, गावागावात होणार जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी व आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता ही सेवा अभियानास १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर या दरम्यान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी स्वच्छतेची चळवळ बळकट करुन स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथाला मुख्य कार्यपालन अधिकारी सुर्यवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) चंद्रशेखर पुद्दटवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अशोक मातकर, समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन चोले, कार्यकारी अभियंता ए. पी मुखरे, एम.बी.मैद्दमवार, आरोग्य विभागाचे भगवान मस्के, गट विकास अधिकारी डी. एम. देवरे, एस.एम. तडस, के. एल. मोरे, कृषी विकास अधिकारी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. एन.एच. फुके, मिडीया सोल्युशनचे उमेश महतो व कार्यक्रम व्यवस्थापक डी.एच. बिसेन यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथ व एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. गावागावात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरणार आहे. शौचालय व स्वच्छतेचे महत्व सांगणारे लघुपट चित्ररथावर गावकºयांना दाखविल्या जाणार आहे.१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा अभियान दरम्यान जिल्ह्यात स्वच्छतेची जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.नादुरुस्त शौचालय व शौचालय असलेल्या कुटुंबाना गृहभेटी करुन स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे, सक्रीय लोकसहभाग मिळविण्यासाठी महिला बचत गटांच्या सभा, शालेयस्तरावर मार्गदर्शन सभा, किशोरवयीन मुलींना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन व ज्येष्ठ नागरिकांची सभा घेवून मार्गदर्शन केल्या जाणार आहे. लोकसहभागातून श्रमदान करुन गाव परिसर स्वच्छता, महापुरुषांचे पुतळे, स्मारके स्वच्छ करणे, परिसर स्वच्छता करण्यात येत असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. लोकसहभागाशिवाय स्वच्छता ही चळवळ होणार नाही, असे सांगून सुर्यवंशी म्हणाले की, स्वच्छतेची सवय स्वत:हून लावून घ्यावी, असे प्रतिपादन सुर्यवंशी यांनी यावेळी केले.