शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: August 12, 2016 02:19 IST

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील

वडखळ/पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.महामार्गावर पळस्पे ते इंदापूर दरम्यान विशेषत: खारपाडा ते वडखळ पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्त्याची पूर्णत: दैना झाली आहे. तसेच हमरापूर फाटा ते सोनखार, दादर व कोपर फाटा ते कोपर या रस्त्यावर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात जि. प. सदस्या कौसल्या पाटील, माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, अ‍ॅड. प्रशांत पाटील, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, यशवंत घासे, माजी अध्यक्ष अनंत पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष हितेश पाटील, महिला अध्यक्षा पूजा मोकल, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी पाटील यांच्यासह विभागातील सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वैकुंठ पाटील म्हणाले की, आज हमरापूर-दादर रस्ता तसेच महामार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत, परंतु स्थानिक आमदार काहीही करत नाहीत. फक्त निवडणुकीच्या काळात येतात, नंतर गायब होतात असे सांगितले. येथून ये-जा करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लगत आहे. त्यामुळेच हे आंदोलन करत आहोत, प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही असे सांगून जर का येत्या आठ दिवसांत सर्व खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कौसल्या पाटील, अनंत पाटील, अविनाश पाटील, मच्छिंद्र पाटील, शिवाजी पाटील आदींनीही खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी विनित गोवेकर यांनी येत्या २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील सर्व खड्डे भरले जातील असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच हमरापूर-दादर रस्त्यावरील खड्डे देखील भरले जातील असे बांधकाम खात्याचे अधिकारी करपे यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक जयसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.