शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मलनिस्सारण योजना राबवून वैनगंगेचे प्रदूषण थांबवा

By admin | Updated: June 14, 2014 01:41 IST

नागपूर शहरातील सांडपाणी नागनदीत सोडले जाते. ते दूषित पाणी वैनगंगेत समायोजित होते.

भंडारा : नागपूर शहरातील सांडपाणी नागनदीत सोडले जाते. ते दूषित पाणी वैनगंगेत समायोजित होते. तद्वतच भंडारा शहरातील सांडपाणीही वैनगंगा नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होत आहे. त्याचे दुष्परिणाम मनुष्य आणि अन्य प्राणिमात्रावर होऊ लागल्याने वैनगंगेचे प्रदूषण तत्काळ थांबवून आरोग्य दृष्ट्रीने मलनिस्सारण योजना राबवून वैनगंगेचे प्रदूषण थांबवा, अशी मागणी नगरसेवक हिवराज उके यांनी भंडारा नगरपालिका, नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व शासनाकडे केली आहे.ज्या ठिकाणचे पाणी मनुष्य किंवा इतर सर्व पशुपक्षी पितात, त्या सर्व ठिकाणी नदी असो की नाले, विहिरी असो की तळे अशा कुठल्याही ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत नाही. तसेच ते सांडपाणी शहरातील असो की उद्योग-व्यवसायातील रसायनयुक्त पाणी सर्वांसाठी घातक आहे. यासाठी काही नियम व कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी करणारी व करवून घेणारी यंत्रणा नीट नसेल तर अशा यंत्रणेचा व कायद्याचा उपयोग काय, असा प्रश्नही उके यांनी उपस्थित केला आहे. दूषित पाणी कुठलेही असो जर नदी नाल्यात किंवा तळ्यात सोडायचा असल्यास शासनाने काही यासाठी प्रकल्प आणि योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. मलनिस्सारण योजना आणि या योजनेमुळे घाण पाणी, सांडपाणी आणि एकूणच दूषित पाणी या प्रक्रिया करून त्याला शुद्ध करून इतरत्र सोडले जाते. परंतु या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा मिळवून घेण्यासाठी जाणिवा आणि इच्छाशक्ती होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची काळाजी गरज आहे. मलनिस्सारण योजना कार्यान्वित करायची असेल तर त्यापूर्वी भूमिगत गटार योजना अंमलात आणावी लागेल आणि त्यासाठी त्यापूर्वी पर्याप्त मात्रेत पाणी उपलब्ध करू शकेल अशी पाण्यासाठी असलेली नगरोत्थान योजना अमलात आणावी लागेल आणि ही नगरोत्थान योजना अमलात आणायची असेल तर त्यापूर्वी सुजल निर्मल योजना अमलात आणावी लागेल. या सर्व योजना एक दुसऱ्याशी निगडित असूनही आजच्या घडीला एकही योजना पूर्णपणे अस्तित्वात आली नाही. सध्या सजल निर्मल योजनेचे सर्वेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु अजूनही त्याला बराच कालावधी लागेल जे फार पूर्वीच व्हायला पाहिजे होते.तत्कालीन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी पासून आमदार निधी व खासदार निधीचा पैसा नगरपालिकेला देऊन पाण्याची समस्या दूर करण्यात यावी म्हणून निवेदने दिली. पैसा आणि पाणी तर दूर साधे निवेदन पत्राचे उत्तर देण्याचे सौजन्यसुद्धा दाखविले नाही. वैनगंगा नदीचे पाणी दूषित होत आहे. प्रदूषित होत आहे. आता नदीत आंघोळीच्या लायकीचे राहिले नाही त्याने आजार बळावू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)