शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यात सर्वाधिक एसीबी ट्रॅप महसूल विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:05 IST

सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणा-या महसूल विभागात राज्यात सर्वाधिक एसीबीचे ट्रॅप झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे११ महिन्यात १८९ प्रकरणे१५ अधिकाऱ्यांसह २४० कर्मचारी अडकले

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणा-या महसूल विभागात राज्यात सर्वाधिक एसीबीचे ट्रॅप झाल्याचे दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गत ११ महिन्यात केलेल्या कारवाईत १८९ प्रकरणात १५ अधिकाऱ्यांसह २४० कर्मचारी अडकले आहेत. त्यात ३३ खासगी व्यक्तींचाही समावेश असून २० लाखांच्यावर लाचेची रक्कम आहे.लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने राज्यात १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ७६३ सापळे यशस्वी केले. यात एक हजार १२ जणांना लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. त्यात सर्वाधिक प्रकरणे राज्यातील महसूल विभागातील आहेत. महसूल विभाग थेट जनतेच्या संपर्कात येणारा विभाग आहे. विविध प्रमाणपत्र आणि कामांसाठी नागरिकांना तलाठ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यत धाव घ्यावी लागते. महसूल विभागतील काम वेळेवर होण्याची कधीच खात्री नसल्याने लाचखोरीला पठबळ मिळते.गत ११ महिन्यात एसीबीने केलेल्या कारवाईत महसूल विभागाचे २४० अधिकारी - कर्मचारी अडकले आहेत. त्यात चार प्रथम श्रेणी अधिकारी, ११ द्वितीय श्रेणी अधिकारी, १६९ तृतीय श्रेणी आणि १९ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच चार इतर लोकसेवक आणि ३३ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून कारवाई करताना २० लाख ८० हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले.पोलीस खातेही आघाडीवरमहसूल विभागापाठोपाठ राज्यात लाचखोरीत पोलीस खातेही आघाडीवर असल्याचे दिसून येते. ११ महिन्यात राज्यात १५९ प्रकरणात २०९ पोलीस अडकले आहेत. त्यात ११ प्रथमश्रेणी अधिकारी आहेत. तर १७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबत पंचायत समिती, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, वन विभाग, महानगर पालिका, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग, कृषी, सहकार व पणन आदी विभागही लाचखोरीच्या प्रकरणात आघाडीवर असल्याचे दिसून येते.

 

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग