शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शाळा सकाळ पाळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:47 IST

दिवसेंगणिक वाढत असलले उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेता आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहेत.

भंडारा : दिवसेंगणिक वाढत असलले उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेता आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांच्या उपस्थिततीत झालेल्या जिल्हा शिक्षण समितीच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. दुपारी १२ वाजता सुरू जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या दालनात यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, उपशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, सातही तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण समितीचे स्विकृत सदस्य रमेश सिंगनजुडे, आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. सभा सुरू होताच रमेश सिंगनजुडे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सकाळपाळीत सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावर उपस्थित उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी शेंडे यांनी सर्वानुमते चर्चा घडवून आणून मंगळवार (१५ मार्च) पासून शाळा सकाळपाळीत भरविण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. यात सकाळी ७.२० ते ११.३० पर्यंत शाळा भरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आधीच सकाळपाळीत भरत आहेत. सद्यस्थितीत इयत्ता दहावीच्या परिक्षा सुरू असल्याने शिक्षकही परिक्षेच्या कामामध्ये व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)प्रगत शैक्षणिक जिल्हास्तरीय कार्यशाळा जुलैमध्ये!प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात हा उपक्रम मोठ्या जोमात सुरू आहे. यासाठी शिक्षकगण तसेच यातील यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू झाल्यामुळे या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. हा मुद्दा रमेश सिंगनजुडे यांनी उपस्थित करून सदर जिल्हास्तरीय कार्यशाळा परीक्षा काळात न घेता नवीन सत्र सुरू होताच जुलैमहिन्यात घेण्यात यावा, असे सूचविले. यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी शेंडे तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर कुठलाही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात येवून सदर कार्यशाळा जुलै महिन्यात होण्यासंदर्भात संमत्ती घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच २० टक्के पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये, आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावी, एनओसी प्रकरणे निकाली काढावी आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली.वाढते उष्णतामान लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा सकाळी ७.२० ते ११.३० या कालावधीत भरविण्यात येणार आहे. शिक्षकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कर्तव्यावर राहणे गरजेचे आहे. यासंबंधाने शक्य तेवढ्या लवकर निर्णय कळविण्यात आला आहे. -किसन शेंडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा.शिक्षक व पालकांची मागणी तसेच वाढते उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेऊन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. ती मागणी आजच्या बैठकीत पूर्ण करण्यात आली आहे. -रमेश सिंगनजुडे, स्वीकृत सदस्य, शिक्षण समिती, जि.प.भंडारा.