शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

आजपासून शाळा सकाळ पाळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:47 IST

दिवसेंगणिक वाढत असलले उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेता आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहेत.

भंडारा : दिवसेंगणिक वाढत असलले उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेता आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांच्या उपस्थिततीत झालेल्या जिल्हा शिक्षण समितीच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. दुपारी १२ वाजता सुरू जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या दालनात यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, उपशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, सातही तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण समितीचे स्विकृत सदस्य रमेश सिंगनजुडे, आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. सभा सुरू होताच रमेश सिंगनजुडे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सकाळपाळीत सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावर उपस्थित उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी शेंडे यांनी सर्वानुमते चर्चा घडवून आणून मंगळवार (१५ मार्च) पासून शाळा सकाळपाळीत भरविण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. यात सकाळी ७.२० ते ११.३० पर्यंत शाळा भरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आधीच सकाळपाळीत भरत आहेत. सद्यस्थितीत इयत्ता दहावीच्या परिक्षा सुरू असल्याने शिक्षकही परिक्षेच्या कामामध्ये व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)प्रगत शैक्षणिक जिल्हास्तरीय कार्यशाळा जुलैमध्ये!प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात हा उपक्रम मोठ्या जोमात सुरू आहे. यासाठी शिक्षकगण तसेच यातील यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू झाल्यामुळे या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. हा मुद्दा रमेश सिंगनजुडे यांनी उपस्थित करून सदर जिल्हास्तरीय कार्यशाळा परीक्षा काळात न घेता नवीन सत्र सुरू होताच जुलैमहिन्यात घेण्यात यावा, असे सूचविले. यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी शेंडे तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर कुठलाही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात येवून सदर कार्यशाळा जुलै महिन्यात होण्यासंदर्भात संमत्ती घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच २० टक्के पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये, आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावी, एनओसी प्रकरणे निकाली काढावी आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली.वाढते उष्णतामान लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा सकाळी ७.२० ते ११.३० या कालावधीत भरविण्यात येणार आहे. शिक्षकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कर्तव्यावर राहणे गरजेचे आहे. यासंबंधाने शक्य तेवढ्या लवकर निर्णय कळविण्यात आला आहे. -किसन शेंडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा.शिक्षक व पालकांची मागणी तसेच वाढते उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेऊन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. ती मागणी आजच्या बैठकीत पूर्ण करण्यात आली आहे. -रमेश सिंगनजुडे, स्वीकृत सदस्य, शिक्षण समिती, जि.प.भंडारा.