शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

एसटी बस ४० फूट खोल पुलाखाली उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली.

ठळक मुद्देवरठीच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळ थरार : ३९ प्रवासी सुदैवाने बचावले, कुणाला साधे खरचटलेही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटीबस रेल्वे ओव्हरब्रीज जवळ ४० फुट खोल उतरल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथे घडली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा थरार घडला. बसचालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्वच्या सर्व ३९ प्रवासी सुदैवाने बचावले.राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली. बसमधील सर्व प्रवाशांनी श्वास रोखले, मात्र अशा कठीण प्रसंगातही चालकाने या बसवर नियंत्रण मिळवत सरळ बस खाली उतरविली. यामुळे बसमधील कुणालाही साधे खरचटले नाही, परंतु पाच मिनिटांचा हा थरार प्रवाशांच्या अंगावर काटे आणणारा होता. अपघातातून बचावल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर भीती आणि आनंद दिसत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात घटनास्थळी दाखल झाले. मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दुसºया बसने भंडाराकडे रवाना केले.चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळलातुमसर - नागपूर ही बस चालक संदेश वाहाणे चालवित होते. वरठीचा रेल्वे ओव्हरब्रीज पार करताना अचानक दुचाकीस्वार आडवा आला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली उतरु लागली. समोर खोल दरी दिसत असताना मोठ्या शिताफीने चालक संदेशने बस हाताळली. समयसूचकता वापरून बस सरळ खाली उतरविली. अपघातातून बचावलेल्या प्रत्येक प्रवाशाने चालक संदेशचे मनापासून आभार मानले. 

नशीब बलवत्तर म्हणून वाचलोया बसमध्ये तब्बल ३९ प्रवाशी होते. महिला व लहान मुलांचा सर्वाधिक समावेश होता. तुमसर तालुक्यातील माजी सैनिकाची पत्नी दमयंती तुरकने याही या बसमध्ये प्रवास करीत होत्या. अपघातानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांना अपघाताचा धक्का बसल्याचे जाणवत होते. मात्र एवढ्या मोठ्या अपघातातून आपणच नाही तर सर्वजण वाचल्याचा आनंदही चेहºयावर स्पष्ट दिसत होता. आमचे नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. या अपघातात कुणाला साधे खरचटलेही नाही.

टॅग्स :Accidentअपघात