शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

एसटी बस ४० फूट खोल पुलाखाली उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली.

ठळक मुद्देवरठीच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळ थरार : ३९ प्रवासी सुदैवाने बचावले, कुणाला साधे खरचटलेही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटीबस रेल्वे ओव्हरब्रीज जवळ ४० फुट खोल उतरल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथे घडली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा थरार घडला. बसचालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्वच्या सर्व ३९ प्रवासी सुदैवाने बचावले.राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली. बसमधील सर्व प्रवाशांनी श्वास रोखले, मात्र अशा कठीण प्रसंगातही चालकाने या बसवर नियंत्रण मिळवत सरळ बस खाली उतरविली. यामुळे बसमधील कुणालाही साधे खरचटले नाही, परंतु पाच मिनिटांचा हा थरार प्रवाशांच्या अंगावर काटे आणणारा होता. अपघातातून बचावल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर भीती आणि आनंद दिसत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात घटनास्थळी दाखल झाले. मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दुसºया बसने भंडाराकडे रवाना केले.चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळलातुमसर - नागपूर ही बस चालक संदेश वाहाणे चालवित होते. वरठीचा रेल्वे ओव्हरब्रीज पार करताना अचानक दुचाकीस्वार आडवा आला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली उतरु लागली. समोर खोल दरी दिसत असताना मोठ्या शिताफीने चालक संदेशने बस हाताळली. समयसूचकता वापरून बस सरळ खाली उतरविली. अपघातातून बचावलेल्या प्रत्येक प्रवाशाने चालक संदेशचे मनापासून आभार मानले. 

नशीब बलवत्तर म्हणून वाचलोया बसमध्ये तब्बल ३९ प्रवाशी होते. महिला व लहान मुलांचा सर्वाधिक समावेश होता. तुमसर तालुक्यातील माजी सैनिकाची पत्नी दमयंती तुरकने याही या बसमध्ये प्रवास करीत होत्या. अपघातानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांना अपघाताचा धक्का बसल्याचे जाणवत होते. मात्र एवढ्या मोठ्या अपघातातून आपणच नाही तर सर्वजण वाचल्याचा आनंदही चेहºयावर स्पष्ट दिसत होता. आमचे नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. या अपघातात कुणाला साधे खरचटलेही नाही.

टॅग्स :Accidentअपघात