शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

एसटी बस ४० फूट खोल पुलाखाली उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली.

ठळक मुद्देवरठीच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळ थरार : ३९ प्रवासी सुदैवाने बचावले, कुणाला साधे खरचटलेही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटीबस रेल्वे ओव्हरब्रीज जवळ ४० फुट खोल उतरल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथे घडली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा थरार घडला. बसचालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्वच्या सर्व ३९ प्रवासी सुदैवाने बचावले.राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस (एमएच ०६ एच ८१९८) तुमसरहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वरठी येथील रेल्वे पुलावरून बस उतरत असताना अचानक एक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट ४० फुट खोल खाईकडे उतरू लागली. बसमधील सर्व प्रवाशांनी श्वास रोखले, मात्र अशा कठीण प्रसंगातही चालकाने या बसवर नियंत्रण मिळवत सरळ बस खाली उतरविली. यामुळे बसमधील कुणालाही साधे खरचटले नाही, परंतु पाच मिनिटांचा हा थरार प्रवाशांच्या अंगावर काटे आणणारा होता. अपघातातून बचावल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर भीती आणि आनंद दिसत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात घटनास्थळी दाखल झाले. मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दुसºया बसने भंडाराकडे रवाना केले.चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळलातुमसर - नागपूर ही बस चालक संदेश वाहाणे चालवित होते. वरठीचा रेल्वे ओव्हरब्रीज पार करताना अचानक दुचाकीस्वार आडवा आला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बस पुलाखाली उतरु लागली. समोर खोल दरी दिसत असताना मोठ्या शिताफीने चालक संदेशने बस हाताळली. समयसूचकता वापरून बस सरळ खाली उतरविली. अपघातातून बचावलेल्या प्रत्येक प्रवाशाने चालक संदेशचे मनापासून आभार मानले. 

नशीब बलवत्तर म्हणून वाचलोया बसमध्ये तब्बल ३९ प्रवाशी होते. महिला व लहान मुलांचा सर्वाधिक समावेश होता. तुमसर तालुक्यातील माजी सैनिकाची पत्नी दमयंती तुरकने याही या बसमध्ये प्रवास करीत होत्या. अपघातानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांना अपघाताचा धक्का बसल्याचे जाणवत होते. मात्र एवढ्या मोठ्या अपघातातून आपणच नाही तर सर्वजण वाचल्याचा आनंदही चेहºयावर स्पष्ट दिसत होता. आमचे नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. या अपघातात कुणाला साधे खरचटलेही नाही.

टॅग्स :Accidentअपघात