शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

वर्षभरानंतरही रोहयोतील मजूर मजुरीपासून वंचित

By admin | Updated: May 2, 2015 00:39 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मोहाडी तालुक्यातील नवेगाव बुज ग्रामपंचायतीच्या वतीने ....

नवेगाव येथील प्रकरण ग्रामपंचायतीचा उपोषणाचा इशाराकरडी (पालोरा) : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मोहाडी तालुक्यातील नवेगाव बुज ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कामे सन २०१४-१५ वर्षात करण्यात आली. मात्र वर्षभरापासून १० मजुरांचे ८ आठवड्यांचे जवळपास ४० ते ४५ हजार रूपयांचे वेतन अजुनही मिळालेले नाहीत. मजुरांवर उपासमारीची वेळ आहे. अनेकदा मागणी व निवेदन दिल्यानंतरही उपयोग झालेला नसल्याने ग्रामपंचायतीने उपोषणावर बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.मौजा नवेगाव बुज येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे वतीने सन २०१४-१५ मध्ये विविध कामे झाली. परंतू कामांच्या मजुरीचे देयक मजुरांच्या खात्यावर वर्षभरापासून जमा झालेले नाहीत. मोहाडी पंचायत समिती येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व मजूर वारंवार विचारणा करीत आहेत. मजुरांची मजुरी त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे उत्तर प्रत्येकवेळी दिले जाते. अधिकारीही तेच टिपीकल उत्तर देतात. मात्र मुख्य पोष्ट आॅफिस भंडारा येथे पदाधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मजुरांच्या खाते क्रमांकावर रक्कम जमा झालीत नाही, असे निदर्शनास येते. मजुरांचे खाते पोष्ट आॅफिसात असून, वेतनाअभावी त्यांचेवर उपासमारीची वेळ आहे.नवेगाव बुज येथील १० मजुरांची मजुरी खात्यावर जमा झालेली नाही. त्या मजुरांमध्ये पूजा उमरकर, प्रकाश तिबुडे, माणिक चकोले, प्रतिभा चकोले, भूमेश्वरी चकोले, कामराज रोडगे, सुमित्रा उमरकर, प्रतिभा मोहतुरे, संग्राम चामलाटे, रूख्मा मंडपे यांचा समावेश आहे. उपरोक्त सर्व मजुरांचे ८ हप्त्यांचे म्हणजे ४८ दिवसांच्या कामांचे वेतन अडकले आहे. मजुरांनी खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर दिले तरीही पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत. मजुरांचे जवळपास ४० ते ४५ हजार रूपये मिळालेले नाहीत. खाते नंबर चुकीचे दिले असतील, आधार क्रमांक चुकीचा दिले असल्यास रोजगार सेवकावर कारवाई करा, मात्र मजुरांची मजुरी वेळेवर द्या अशा मागणीचे निवेदन आ. चरण वाघमारे, सीईओ राहूल द्विवेदी, खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले.या अगोदर मोहाडी पंचायत समितीमध्ये झालेल्या आमसभेत सुद्धा प्रश्न लावून धरण्यात आलेला होता, परंतु काहीही झालेले नाही. त्यामुळे आमसभेतील प्रश्न आतापर्यंत सुटत नसतील तर आमदार महोदयांनी निव्वळ सोंग दाखवावे कशाला, असा प्रश्न मजुरांचा आहे. वेळीच प्रश्न न सुटल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्धार सरपंच निर्मला चकोले, उपसरपंच विजय बांते, ग्रामपंचायत पदाधिकारी व मजुरांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)