शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा ‘आत्मा’ वाऱ्यावर

By admin | Updated: February 13, 2017 00:18 IST

शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण प्रकल्प ठरलेल्या कृषी विभागाचा ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) प्रकल्पाचा कारभार सध्या वाऱ्यावर सुरु आहे.

भंडारा : शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण प्रकल्प ठरलेल्या कृषी विभागाचा ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) प्रकल्पाचा कारभार सध्या वाऱ्यावर सुरु आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा हा त्यामागील मुळ उद्देश असला तरी या मुळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. सदर प्रकल्पाचे कामकाज नागपूरहून संचालित होत असल्याने जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे योजनेचे पाणी दुसरीकडे मुरत असल्याची ओरड आहे. भंडारा जिल्ह्यातील आत्मा समन्वयक पद रिक्त असून त्याचा कार्यभार नागपूर जिल्ह्याचे अधिकारी प्रज्ञा गोडघाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्या क्वचितच जिल्ह्यात महिन्याकाठी येत असतात. आत्मा विभागाच्या बऱ्याच बाबी खटकणाऱ्या आहेत. जिल्ह्यात या विभागाच्या योजना राबविताना गैरप्रकार झाल्याची ओरड आहे. शेतकरी मित्र मोबदला असो की साहीत्य खरेदीबाबद निर्णय, याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्मा प्रकल्प विभागाचा कामकाजाबाबद असमाधानी असून गैरप्रकाराचा चौकशीची मागणी होत आहे. आत्मा विभागामार्फत सन २०१६-१७ मध्ये मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत शासनाकडून जवळपास ४० लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला. परंतु या योजनेतून कोणत्याही कामांचा निविदा न काढता मनमर्जीने कामे करण्यात आली. भाजीपाले बियाणे महाबिज किंवा इतर शासनमान्य संस्थेकडून खरेदी न करता नागपूरातील खासगी दूकानातून खरेदी करण्यात आली आहे. तसेच शासनाचे किंवा विद्यापिठाची कोणतीही शिफारस नसताना खासगी विक्रेत्यांकडून ‘नळ्या’ खरेदी करण्यात आल्या. त्या ढिंबक नळ्या काही महिन्यातच खराब झाल्याची माहिती आहे. साहित्यांच्या ई-निविदा न काढता लक्षावधी रुपयांचे प्लास्टीकड्रम सेंद्रीय शेती योजना व मानव विकास योजनेतून खरेदी करण्यात आले आहे, अशीही जिल्ह्यात चर्चा आहे.आत्मा अंतर्गत सर्व साहित्यांची खरेदी एम आयडीसी कडून न करता मागील काही वर्षांपासून खासगी दुकानातून होत असल्याची ओरड आहे. विभागाचे प्रकल्प संचालक प्रभारी असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांकडे असलेले त्यांचे स्वत:चे वाहन ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत वापरण्यात आल्याची माहिती असून वर्षाकाटी त्यापोटी २ लाखांपेक्षा जास्त रकमेची उचल करण्यात आल्याची माहिती आहे.आत्मा प्रकल्प विभागांतर्गत योजना राबविताना किंवा प्रकल्प अभियानाची अंमलबजावणी करताना वित्तीय नियमांचे पालन करण्यात येत नसल्यामुळे गैरप्रकाराला वाव मिळत असल्याचेही सांगण्यात येते. यासंदर्भात आत्मा प्रकल्प संचालक पदाला अनुसरण असणाऱ्या समकक्ष पद असणाऱ्या अधिकाऱ्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)‘आत्मा’ विभागांतर्गत करण्यात येणारी कामे नियमांतर्गत झाली आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहे. वाहन प्रकरणी संशय आहे. सन २०१६-१७ पासून योजनांमधील लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ निधी वळता केला जात आहे. शेतकरी सर्व साहित्यांची खरेदी करतात. विभागामार्फत खरेदी केली जात नाही. मानव विकास कार्यक्रम व सेंद्रीय शेती योजनांमधील खरेदी सुध्दा शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचा निधीसुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे. शेतकरी त्यांच्या सोयीने साहित्याची खरेदी करीत असतात. भंडारा जिल्ह्यात आठवड्यातून दोन वेळा भेट होत असते. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा भर असतो.- प्रज्ञा गोडघाटे, प्रभारी, आत्मा प्रकल्प संचालक भंडारा