शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कृषी विभागाचा ‘आत्मा’ वाऱ्यावर

By admin | Updated: February 13, 2017 00:18 IST

शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण प्रकल्प ठरलेल्या कृषी विभागाचा ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) प्रकल्पाचा कारभार सध्या वाऱ्यावर सुरु आहे.

भंडारा : शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण प्रकल्प ठरलेल्या कृषी विभागाचा ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) प्रकल्पाचा कारभार सध्या वाऱ्यावर सुरु आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा हा त्यामागील मुळ उद्देश असला तरी या मुळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. सदर प्रकल्पाचे कामकाज नागपूरहून संचालित होत असल्याने जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे योजनेचे पाणी दुसरीकडे मुरत असल्याची ओरड आहे. भंडारा जिल्ह्यातील आत्मा समन्वयक पद रिक्त असून त्याचा कार्यभार नागपूर जिल्ह्याचे अधिकारी प्रज्ञा गोडघाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्या क्वचितच जिल्ह्यात महिन्याकाठी येत असतात. आत्मा विभागाच्या बऱ्याच बाबी खटकणाऱ्या आहेत. जिल्ह्यात या विभागाच्या योजना राबविताना गैरप्रकार झाल्याची ओरड आहे. शेतकरी मित्र मोबदला असो की साहीत्य खरेदीबाबद निर्णय, याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्मा प्रकल्प विभागाचा कामकाजाबाबद असमाधानी असून गैरप्रकाराचा चौकशीची मागणी होत आहे. आत्मा विभागामार्फत सन २०१६-१७ मध्ये मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत शासनाकडून जवळपास ४० लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला. परंतु या योजनेतून कोणत्याही कामांचा निविदा न काढता मनमर्जीने कामे करण्यात आली. भाजीपाले बियाणे महाबिज किंवा इतर शासनमान्य संस्थेकडून खरेदी न करता नागपूरातील खासगी दूकानातून खरेदी करण्यात आली आहे. तसेच शासनाचे किंवा विद्यापिठाची कोणतीही शिफारस नसताना खासगी विक्रेत्यांकडून ‘नळ्या’ खरेदी करण्यात आल्या. त्या ढिंबक नळ्या काही महिन्यातच खराब झाल्याची माहिती आहे. साहित्यांच्या ई-निविदा न काढता लक्षावधी रुपयांचे प्लास्टीकड्रम सेंद्रीय शेती योजना व मानव विकास योजनेतून खरेदी करण्यात आले आहे, अशीही जिल्ह्यात चर्चा आहे.आत्मा अंतर्गत सर्व साहित्यांची खरेदी एम आयडीसी कडून न करता मागील काही वर्षांपासून खासगी दुकानातून होत असल्याची ओरड आहे. विभागाचे प्रकल्प संचालक प्रभारी असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांकडे असलेले त्यांचे स्वत:चे वाहन ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत वापरण्यात आल्याची माहिती असून वर्षाकाटी त्यापोटी २ लाखांपेक्षा जास्त रकमेची उचल करण्यात आल्याची माहिती आहे.आत्मा प्रकल्प विभागांतर्गत योजना राबविताना किंवा प्रकल्प अभियानाची अंमलबजावणी करताना वित्तीय नियमांचे पालन करण्यात येत नसल्यामुळे गैरप्रकाराला वाव मिळत असल्याचेही सांगण्यात येते. यासंदर्भात आत्मा प्रकल्प संचालक पदाला अनुसरण असणाऱ्या समकक्ष पद असणाऱ्या अधिकाऱ्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)‘आत्मा’ विभागांतर्गत करण्यात येणारी कामे नियमांतर्गत झाली आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहे. वाहन प्रकरणी संशय आहे. सन २०१६-१७ पासून योजनांमधील लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ निधी वळता केला जात आहे. शेतकरी सर्व साहित्यांची खरेदी करतात. विभागामार्फत खरेदी केली जात नाही. मानव विकास कार्यक्रम व सेंद्रीय शेती योजनांमधील खरेदी सुध्दा शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचा निधीसुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे. शेतकरी त्यांच्या सोयीने साहित्याची खरेदी करीत असतात. भंडारा जिल्ह्यात आठवड्यातून दोन वेळा भेट होत असते. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा भर असतो.- प्रज्ञा गोडघाटे, प्रभारी, आत्मा प्रकल्प संचालक भंडारा