शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भंडारात अतिवृष्टी होताच सखल भागात साचते पाणी, उपाय योजनांकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपाययोजना करण्यात येतात. यावर्षी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुक्ष्म नियाेजन केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून सर्व घटक सदस्यांना त्यांच्या कार्याची माहितीही आधिच देण्यात आली आहे. यापुर्वीच्या बाबतीत मात्र कधीही असे सुक्ष्म नियोजन झाले नाही. तेव्हाही निधीचा वाणवा कायम होता.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात अतिवृष्टी केवळ वैनगंगा नदीला पूर आल्यास सखल भागात पाणी शिरते. वेळप्रसंगी अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले जाते. यात विशेषत: ग्रामसेवक कॉलनी, काजीनगर, न्यु गौतमबुद्ध वॉर्ड, प्रगती कॉलनी परिसर, भोजापूर आदी भागांचा समावेश असतो. ऑगस्ट २०२० आलेल्या महापुराने अनेक कुटुंबांना झळ बसविली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर्षी अतिवृष्टी किंंवा पुराने कुणी बाधित झाल्यास याबाबत पूर्ण तयारी केली असल्याचे दिसून येते.

शहरातील पाणी साचणारी ठिकाणे - शहरात अनेक ठिकाणी पाणी साचत असते. शहरात कोणत्याही प्रमाणात नागरी वस्तीचे नियोजन नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हा भाग उंच स्वरूपात आहे. तर शहराच्या सभोवतालचा परिसर खोलगट असल्याने विशेषत: ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, बेला, नागपूर नाका, टाकळी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. 

निधीचा वाणवा कायम- पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपाययोजना करण्यात येतात. यावर्षी जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुक्ष्म नियाेजन केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून सर्व घटक सदस्यांना त्यांच्या कार्याची माहितीही आधिच देण्यात आली आहे. यापुर्वीच्या बाबतीत मात्र कधीही असे सुक्ष्म नियोजन झाले नाही. तेव्हाही निधीचा वाणवा कायम होता. यावेळी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीची तरतूद केल्याचे समजते. मात्र अजुनपर्यंत पूर परिस्थिती उदभवलेली नाही.

जिल्हा प्रशासनाचे सुक्ष्म नियोजनअन्य जिल्ह्यातून किंवा राज्यातून धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात त्या पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. परिणामी वेळोवेळी तंतोतंत माहिती उपलब्ध होत असल्याने जिल्हा प्रशासन नदीकाठावरील गावांना वेळीच सतर्क करीत असते. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.

पाऊस नको नको सा.....गतवर्षीच्या महापुरात होत्याचे नव्हते झाले. अनेक साहित्य वाहून गेले. मात्र हव्या त्याप्रमाणात मदत दिली गेली नाही. आजही भोजापूर व आनंदनगरातील कुटुंब महापुराच्या तडाख्यापासून पूर्णत: सावरले नाहीत. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- अशोक उके

महापुरात अनेक कुटुंबांना तडाखा बसला. यावेळेही योग्य नियोजन झाले नाही तर सखल भागात पाणी शिरून नुकसान होवू शकते. वेळप्रसंगीत कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविणे व साहित्यांची राखण झाल्यास त्यांना तेवढी मदत होईल.- शाहिद शेख

पाणी साचण्याची कारणे

वैनगंगा नदीत संजय सरोवर, कालीसराड, पुजारीटोला धरणाचे पाणी सोडल्याने नदीला पूर येतो. या पुराचे पाणी शहरात बॅक वॉटर पद्धतीने शहरात शिरते. यातील बहुतांश भाग सखल स्वरूपात आहे. शहराला पुराच्या बॅकवॉटर पासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा भिंतीचे बांधकाम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळेही सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर