शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सोंड्याटोला प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर!

By admin | Updated: May 3, 2015 00:46 IST

राजकीय इच्छाशक्तीअभावी तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे.

ग्रामसभेत ठराव घेणार खासदार, आमदारांना करणार गावबंदी रंजित चिचखेडे : चुल्हाड (सिहोरा) राजकीय इच्छाशक्तीअभावी तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे. या प्रकल्पाची समस्या निकाली काढण्यात लोकप्रतिनिधींचे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे यापूढे आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा महिला सरपंचानी दिला आहे.सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेतजमिन ओलिताखाली आणण्यासाठी युती शासनाच्या काळात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले. आघाडी शासनाच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. सन २००७ पासून नदी पात्रातून पाण्याचा उपसा सुरू आहे. यामुळे परिसरातील १२ हजार हेक्टर शेती खरिप हंगामात ओलीताखाली येत आहे. याशिवाय रबी हंगामात डावा आणि उजवा कालव्याअंतर्गत रोस्टर पध्दतीने तीन हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होत आहे. परंतु प्रकल्पाचे ३६,६०० रुपयाचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांपासून ११० कोटी खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंधारात आहे.जंगलव्याप्त भागात असणाऱ्या या प्रकल्पाची सुरक्षा अंधारात सुरू आहे. तीन सुरक्षारक्षक या प्रकल्पाची २४ तास जबाबदारी सांभाळत आहेत. हा प्रकल्प जंगल परिसरात असून याठिकाणी हिंसक प्राण्याचा वावर आहे. त्यामुळे रात्री या सुरक्षा रक्षकांच्या जिवाला भीती निर्माण झाली आहे. पंपगृहाच्या टाकीतील गाळ उपसा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आली नाही. यामुळे यंदा प्रकल्प नदी पात्रातुन पाण्याचा उपसा करणार किंवा नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सिहोरा परिसरातील शेतकरी आणि सरपंचानी चिंता व्यक्त करुन यापूढे आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा दिला आहे.दोन्ही विभागाचे कानावर हाततिरोडा उपसा सिंचन योजना तिरोडाच्या नियंत्रणात हा प्रकल्प असून निधी उपलब्ध नाही. अशी माहिती यापूर्वी देण्यात आली आहे. तर पाटबंधारे विभागाला प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नसल्याने त्यांचेही कानावर हात आहेत. शेतकरी तथा प्रकल्पाला संजिवनी देण्याची जबाबदारी आता विद्यमान खासदार व आमदार यांच्यावर आली आहे.सोंड्याटोला प्रकल्पाने पाण्याचा उपसा थांबविल्यास परिसरातील शेती अडचणीत येणार आहे. प्रकल्पातील समस्या निकाली काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. पावसाळयापुर्वी लक्ष घातले पाहिजे. - विमल कानतोडे, सरपंच मोहाडी (खापा)आघाडी शासनाच्या काळात पाण्याचा नियमित उपसा करण्यात आला. खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना पाणी मिळाले. परंतु, आता राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रकल्पाला उतरती कळा लागली आहे.- प्रेरणा तुरकर, सरपंच, देवरी (देव)