शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

सोंड्याटोला प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर!

By admin | Updated: May 3, 2015 00:46 IST

राजकीय इच्छाशक्तीअभावी तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे.

ग्रामसभेत ठराव घेणार खासदार, आमदारांना करणार गावबंदी रंजित चिचखेडे : चुल्हाड (सिहोरा) राजकीय इच्छाशक्तीअभावी तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे. या प्रकल्पाची समस्या निकाली काढण्यात लोकप्रतिनिधींचे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे यापूढे आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा महिला सरपंचानी दिला आहे.सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेतजमिन ओलिताखाली आणण्यासाठी युती शासनाच्या काळात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले. आघाडी शासनाच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. सन २००७ पासून नदी पात्रातून पाण्याचा उपसा सुरू आहे. यामुळे परिसरातील १२ हजार हेक्टर शेती खरिप हंगामात ओलीताखाली येत आहे. याशिवाय रबी हंगामात डावा आणि उजवा कालव्याअंतर्गत रोस्टर पध्दतीने तीन हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होत आहे. परंतु प्रकल्पाचे ३६,६०० रुपयाचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांपासून ११० कोटी खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंधारात आहे.जंगलव्याप्त भागात असणाऱ्या या प्रकल्पाची सुरक्षा अंधारात सुरू आहे. तीन सुरक्षारक्षक या प्रकल्पाची २४ तास जबाबदारी सांभाळत आहेत. हा प्रकल्प जंगल परिसरात असून याठिकाणी हिंसक प्राण्याचा वावर आहे. त्यामुळे रात्री या सुरक्षा रक्षकांच्या जिवाला भीती निर्माण झाली आहे. पंपगृहाच्या टाकीतील गाळ उपसा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आली नाही. यामुळे यंदा प्रकल्प नदी पात्रातुन पाण्याचा उपसा करणार किंवा नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सिहोरा परिसरातील शेतकरी आणि सरपंचानी चिंता व्यक्त करुन यापूढे आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा दिला आहे.दोन्ही विभागाचे कानावर हाततिरोडा उपसा सिंचन योजना तिरोडाच्या नियंत्रणात हा प्रकल्प असून निधी उपलब्ध नाही. अशी माहिती यापूर्वी देण्यात आली आहे. तर पाटबंधारे विभागाला प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नसल्याने त्यांचेही कानावर हात आहेत. शेतकरी तथा प्रकल्पाला संजिवनी देण्याची जबाबदारी आता विद्यमान खासदार व आमदार यांच्यावर आली आहे.सोंड्याटोला प्रकल्पाने पाण्याचा उपसा थांबविल्यास परिसरातील शेती अडचणीत येणार आहे. प्रकल्पातील समस्या निकाली काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. पावसाळयापुर्वी लक्ष घातले पाहिजे. - विमल कानतोडे, सरपंच मोहाडी (खापा)आघाडी शासनाच्या काळात पाण्याचा नियमित उपसा करण्यात आला. खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना पाणी मिळाले. परंतु, आता राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रकल्पाला उतरती कळा लागली आहे.- प्रेरणा तुरकर, सरपंच, देवरी (देव)