शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

६० शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप कार्यान्वित

By admin | Updated: February 9, 2017 00:28 IST

जिल्ह्यात शासनाने १९५ सौर कृषी पंप ९५ टक्के अनुदानावर आस्थापित करण्याचे निश्चित क ेले आहे.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य : योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनभंडारा : जिल्ह्यात शासनाने १९५ सौर कृषी पंप ९५ टक्के अनुदानावर आस्थापित करण्याचे निश्चित क ेले आहे. अटल सौर कृषीपंप योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येत असून ५ एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीवर किंवा शेततळ्यांवर अटल सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेण्याकरिता शेतकरी अर्ज करू शकतात. जिल्ह्यात आजपर्यंत ६१ कृषी पंप आस्थापित व कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सौर कृषीपंपाची कार्यपद्धती व फायदे समजविण्याकरिता प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात भेट देवून ३० मार्च २०१७ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.या योजनेत १० वर्षाचा विमा व १० वर्षाची निगा व दुरुस्ती यांचा समावेश आहे. शासनाने ५ एकरापर्यंतची अट शिथील केली असून आता १० एकर शेती असलेला शेतकरी यात भाग घेवू शकतो. परंतु त्याकरिता त्यांना १५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.सौर कृषीपंपाचे फायदेयोजनेत ९५ टक्के शासनाकडून अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के हिस्सा भरावयाचा आहे. शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे वीज बिल व इतर चार्जेस भरावी लागत नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना दिवसा ८ तास व रात्री १० तास याप्रमाणे चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. परंतु सौर कृषीपंपामार्फत शेतकऱ्यांना जवळपास १० ते १२ तास दिसालाच वीज पुरवठा उपलब्ध असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याकरिता रात्रीला जाण्याची आवश्यकता नाहदी. शेतकऱ्यांनी सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेतल्यास तेथे शिल्लक असणारी वीज दुसऱ्या ग्राहकास उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे सुद्धा भारनियमनाचे प्रमाण कमी होऊ शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे व वादळामुळे लाईनमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होतो. या योजनेमध्ये ती स्थिती उद्भवणार नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची वर्षाला ८ ते १० हजार इतकी बचत होत आहे. भविष्यामध्ये शेतीपंपाचे विजेचे दर वाढू शकतात. त्यामुळे १० वर्षाचा विचार केल्यास शेतकऱ्यांना वीज बिलापोटी शेतकऱ्यांना २ लाख रुपयाच्यावर लाभ होवू शकतो. ज्या शेतकऱ्यांने १० वर्षाकरिता विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्काची आवश्यकता नाही. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच चोरीमुळे नुकसान झाल्यास त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. १० वर्ष देखभाल व दुरुस्तीचा करण्याची योजनेत तरतूद आहे. शेतकरी १० वर्षानंतर पारंपारिक पद्धतीचा वीज जोडणीकरिता अर्ज करू शकतात. अटल सौर कृषीपंप योजनेमार्फत विशेष वीज रोधक योजना बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे आकाशातून पडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे घर बसल्या संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. वीज निर्मिती करिता लागणाऱ्या कोळशाची तसेच पाण्याची बचत होणार. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याकरिता मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जासोबत सातबाराचा उतारा, अल्प भूधारक असल्याचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे. (नगर प्रतिनिधी)