शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

६० शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप कार्यान्वित

By admin | Updated: February 9, 2017 00:28 IST

जिल्ह्यात शासनाने १९५ सौर कृषी पंप ९५ टक्के अनुदानावर आस्थापित करण्याचे निश्चित क ेले आहे.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य : योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनभंडारा : जिल्ह्यात शासनाने १९५ सौर कृषी पंप ९५ टक्के अनुदानावर आस्थापित करण्याचे निश्चित क ेले आहे. अटल सौर कृषीपंप योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येत असून ५ एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीवर किंवा शेततळ्यांवर अटल सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेण्याकरिता शेतकरी अर्ज करू शकतात. जिल्ह्यात आजपर्यंत ६१ कृषी पंप आस्थापित व कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सौर कृषीपंपाची कार्यपद्धती व फायदे समजविण्याकरिता प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात भेट देवून ३० मार्च २०१७ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.या योजनेत १० वर्षाचा विमा व १० वर्षाची निगा व दुरुस्ती यांचा समावेश आहे. शासनाने ५ एकरापर्यंतची अट शिथील केली असून आता १० एकर शेती असलेला शेतकरी यात भाग घेवू शकतो. परंतु त्याकरिता त्यांना १५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.सौर कृषीपंपाचे फायदेयोजनेत ९५ टक्के शासनाकडून अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के हिस्सा भरावयाचा आहे. शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे वीज बिल व इतर चार्जेस भरावी लागत नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना दिवसा ८ तास व रात्री १० तास याप्रमाणे चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. परंतु सौर कृषीपंपामार्फत शेतकऱ्यांना जवळपास १० ते १२ तास दिसालाच वीज पुरवठा उपलब्ध असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याकरिता रात्रीला जाण्याची आवश्यकता नाहदी. शेतकऱ्यांनी सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेतल्यास तेथे शिल्लक असणारी वीज दुसऱ्या ग्राहकास उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे सुद्धा भारनियमनाचे प्रमाण कमी होऊ शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे व वादळामुळे लाईनमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होतो. या योजनेमध्ये ती स्थिती उद्भवणार नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची वर्षाला ८ ते १० हजार इतकी बचत होत आहे. भविष्यामध्ये शेतीपंपाचे विजेचे दर वाढू शकतात. त्यामुळे १० वर्षाचा विचार केल्यास शेतकऱ्यांना वीज बिलापोटी शेतकऱ्यांना २ लाख रुपयाच्यावर लाभ होवू शकतो. ज्या शेतकऱ्यांने १० वर्षाकरिता विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्काची आवश्यकता नाही. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच चोरीमुळे नुकसान झाल्यास त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. १० वर्ष देखभाल व दुरुस्तीचा करण्याची योजनेत तरतूद आहे. शेतकरी १० वर्षानंतर पारंपारिक पद्धतीचा वीज जोडणीकरिता अर्ज करू शकतात. अटल सौर कृषीपंप योजनेमार्फत विशेष वीज रोधक योजना बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे आकाशातून पडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे घर बसल्या संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. वीज निर्मिती करिता लागणाऱ्या कोळशाची तसेच पाण्याची बचत होणार. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याकरिता मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जासोबत सातबाराचा उतारा, अल्प भूधारक असल्याचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे. (नगर प्रतिनिधी)