शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

बारव्हा बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

३० मार्च रोजी आठवडी बाजार भरविण्यात आला. भाजीपाला विक्रेत्यांनी सदर बाजार नेहमीच्या ठिकाणी भरविण्यात आला. मात्र भाजीपाला खरेदी करताना नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जागरूक नागरिकांनी यावर रोष व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देभाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी : स्थानिक पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. ३० मार्च रोजी आठवडी बाजार भरविण्यात आला. भाजीपाला विक्रेत्यांनी सदर बाजार नेहमीच्या ठिकाणी भरविण्यात आला. मात्र भाजीपाला खरेदी करताना नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जागरूक नागरिकांनी यावर रोष व्यक्त केला आहे.गेल्या आठवड्यात खोलमारा टी-पांईट व बारव्हा बसस्थानक परिसरात बाजार भरला होता, पुन्हा तिथेच बाजार भरविण्याचा प्रयत्न भाजीपाला विक्रेत्यांनी केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना मनाई केली व बाजार मुख्य बाजारपेठेत भरविण्यात आला. तर दुसरीकडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी शेकडो नागरिकांनी कोणतीही सुरक्षितता न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकार घडत असताना पोलिस विभाग मात्र कोणतीही कारवाई केली नाही.संबंधित दिघोरी पोलीस विभाग या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने बारव्हा परिसरातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मुक्त संचार करीत आहेत. नागरिकांवर पोलिस विभागाचा कोणताही वचक नसल्याने महत्त्वाचे काम नसतानासुद्धा नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.भाजीपाला, किराणा, औषधी आदी वस्तू जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना खरेदी करणे आवश्यक आहे मात्र वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. भारत देशासह संपूर्ण जगात कोरोणा व्हायरसने कहर केला आहे. नागरिक घराबाहेर न पडता दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नागरिकांनी जागरूकता बाळगली नाही तर संसर्गाचा धोका आहे.

टॅग्स :MarketबाजारSocialसामाजिक