शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचे साकडे

By admin | Updated: November 27, 2014 23:28 IST

येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

भंडारा : येथील जकातदार विद्यालयात मागील पाच महिन्यांपासून इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविण्यासाठी नियमितरित्या शिक्षक नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.माहितीनुसार मागील सत्रात येथे विज्ञान विषयाच्या शिक्षकाची बदली झाली. त्यानंतर या ठिकाणी विज्ञान शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नियमितरित्या वर्ग झाले नाहीत. त्यामुळे जुलै महिन्यापासून विज्ञान विषयासंदर्भात विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन हव्या त्या प्रमाणात झालेले नाही. विज्ञान विषय पुरेशा प्रमाणात न शिकविता प्रथम सत्रांत परीक्षा दिवाळीपूर्वी घेण्यात आली. शाळेत विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्यामुळे सत्रांत परीक्षेतील पेपर अजूनपावतो तपासणी करून परत मिळालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे टेंशन बळावले आहे. या संदर्भात त्यांनी वारंवार शाळेचे मुख्याध्यापक तथा अन्य शिक्षकांना माहिती दिली. मात्र शिक्षण विभागामार्फत शिक्षकाची सोय करण्यात आली नाही. त्याचा फटका येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. दहावीचे वर्ष हे टर्निंग पॉइंट म्हणून एका दृष्टीकोणातून बघितले जाते. विज्ञान विषयासारख्या महत्वपूर्ण विषयासाठी शिक्षक नसणे ही बाब विद्यार्थ्यांसाठी गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे शिक्षक नसल्यामुळे दहाव्या वर्गातील काही विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान विषयातच नापास झाले असल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता महत्वाची भूमिका वठविण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार कळवूनही शिक्षण विभाग या गंभीर विषयाकडे गांभीर्याने बघत नाही काय? असा सवाल येथील विद्यार्थ्यांनी केली आहे. शिक्षकासाठी विद्यार्थ्यांची विणवणी कायम असून याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने बघणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)