शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

विद्रुप चौकांना हवा ‘स्मार्ट लूक’

By admin | Updated: October 25, 2015 00:33 IST

शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो.

चौकांना अतिक्रमणाचा विळखा : बॅनर, पोस्टर्सही हटविणे आवश्यकभंडारा : शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीसाठी चौक हेच मार्गदर्शक असतात. म्हणूनच की काय चौकातील वाहतूक व्यवस्था, सौंदर्यीकरण, मार्गांची माहिती दर्शनीय भागात दिसेल असे फलक, पुतळ्यांची स्थिती आणि तेथील दृष्यबाबी त्यावर प्रभाव पाडत असतात. मात्र भंडारा शहरातील चौक यातील कोणतेही निकष पूर्ण करताना दिसत नाही. चौकात ट्रॅफिक सिग्नलचा बोजवारा आहे. एकाही चौकात हिरवळीचा लवलेश नाही. वाहतूक नियमावली दर्शविणारे चिन्ह चौकातून गायब आहेत, चौकात रस्त्यांची माहिती दर्शविणारे फलक आढळत नाही. मात्र जाहिरातींच्या फलकांनी चौकांचे विद्रुपीकरण झालेले दिसते. चौकांचे असेच विद्रुपीकरण सुरू राहिले तर या शहराला ‘स्मार्ट लूक’ कसा येणार, यावर विचार करण्याची गरज आहे. जाहिरातींचा ओंगळवाणा बाजारशहरातील चौकांमध्ये जाहिरात फलकांचा बाजार किळसवाणा होत चालला आहे. राजकीय पदाधिकारी, कंपन्या, दुकानांच्या जाहिरात फलकांनी चौक भरून आहेत. यामुळेच नियम फलक व रस्त्यांची माहिती देणारे आवश्यक फलक लावायला जागा उरली नाही. या जाहिरातबाजीवर प्रशासनाचेही नियंत्रण राहिले नसल्याने हा ओंगळवाणा प्रकार फोफावला आहे. यामुळे चौकांचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते. चौकांना स्मार्ट स्वरूप द्यायचे असेल तर या विद्रुपीकरणाला आळा घालणे आवश्यक झाले आहे.वाहतुकीचा गोंधळचौकात शिस्तीचा अभाव असल्याने शहरातील जवळपास सर्वच चौकात वाहतुकीचा गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळते. मुख्य चौकातील महत्त्वाची समस्या म्हणजे वाहतुकीची आहे. आॅटोचालक प्रवासी मिळविण्यासाठी सैरभैर फिरत असतात. यामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष राहिले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे पादचाऱ्यांनाही त्रासाला सामोर जावे लागते. चौकात जड वाहने, कार आणि दुचाकी कशाही पद्धतीने उभ्या राहतात. वाहतुकीचा हा गोंधळ सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)