शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

पावसाळ्यातही लहान, मोठे प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:07 IST

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली नाही. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

ठळक मुद्दे१४ टक्केच जलसाठा : शेतकरी संकटात, अनेक गावांत जलसंकट

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली नाही. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १४़०३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २़६५४, बघेडा ३०़०१, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १२.४२ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ८.८२ टक्के आहे़ जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १७़९२ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ १९ जुलै रोजी ६३ प्रकल्पात ३८़८७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ३०़२० एवढी होती.१२ प्रकल्प कोरडे तर काही प्रकल्पात मृतसाठापावसाळ्याचे जून, जुलै महिन्यात पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. ६३ प्रकल्पापैकी १२ प्रकल्प कोरडे असून बहुतांश प्रकल्पात मृतसाठा आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांवर अस्मानी संकट ओढावले आहे. जिल्ह्यात अनेक गावात आजही जलसंकट कायम असून पाण्यासाठी वनवण भटकण्याची वेळ आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी १८ टक्के पाऊस कमी बरसला आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई