शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती भयावह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:04 IST

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न बरसल्याने प्रकल्पांची स्थिती भयावह आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५० टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही.

ठळक मुद्दे२७ टक्के जलसाठा : उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईचे संकेत

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न बरसल्याने प्रकल्पांची स्थिती भयावह आहे. जिल्ह्यातील चार मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५० टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. २८ जुने मालगुजारी तलावात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यापुर्वीच रबी हंगामातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत केवळ २७.३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाºया लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २७ टक्के पाण्याचा साठा आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ३९ टक्के जलसाठा होता. मात्र, पाऊस कमी पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठयात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २३, बघेडा ६.५० टक्के जलसाठा आहे. बेटेकर बोथली प्रकल्पात २८ तर, सोरणा जलाशयात २.१६ टक्के जलसाठ्याची नोंद आहे. चारही मध्यम प्रकल्पात १९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी चार मध्यम प्रकल्पात आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६.८६ टक्के जलसाठा शिल्लक होता.जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३२.२४ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ३०.४२ टक्के आहे. ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे.अनेक भागात नळाद्वारे दुषीत पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपण्याचा स्थितीत असतांनाही जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ ३३.३२९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी कमी असल्याने उन्हाळ्यापुर्वीच पाण्याचे संकट बळावणार यात तिळमात्र शंका नाही.पावसाळ्यात केवळ ६७ टक्के पाऊसभंडारा जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी. पाऊस पडतो. गतवर्षी २०१६ मध्ये २९ आॅक्टोबरपर्यंत ९८८.३ मि.मी. च्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा मात्र पावसाळ्याभरात आजपर्यंत केवळ ८८४.१ मि.मी. पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी १०४.२ मि.मी. पाऊस कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. एकंदरच भंडारा तालुक्यात ५५ टक्के, मोहाडी ७३, तुमसर ६२, पवनी ८५, साकोली ५६, लाखांदूर ७२ तर लाखनी तालुक्यात ६५ टक्के पावसाची नोंद आहे. अत्यल्प पावसामुळे जलसाठे निम्यापेक्षा अधिक भरले नाही. परिणामी येत्या काळात पाणीटंचाईचा सामना अनेक गावांना बसण्याची शक्यता आहे.