शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

साहेब, पऱ्हे जगवायला तरी पाणी सोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:22 PM

अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : नेरला उपसा सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात संताप

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार शेतकरी कार्यालयात जाऊन विचारपूस करीत असताना नेमके पाणी कधी मिळणार याची माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नेरला उपसा सिंचन कार्यालयाबद्दल तिव्र संताप व्यक्त होत आहे.अड्याळ परिसरातील सिंचनाची स्थिती बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. एकीकडे पावसाने ओढ दिले आहे तर दुसरीकडे अधिकारी म्हणतात, नेरला उपसा सिंचन सुरु होण्यासाठी पाण्याची २४१.२९ इतकी पातळी आवश्यक आहे.पाण्याची पातळी उंचावल्यास पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्याकडून दिले जता आहे. मात्र निश्चित दिवस सांगीतला जात नसल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे करपू लागले आहेत. तरीदेखील प्रशासनाला जाग येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी राजेंद्र ब्राम्हणकर यांच्यासह रस्त्यावर उतरुन पाण्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. गोसे धरणाच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. डावा व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असताना अड्याळ परिसरात मात्र शेतकऱ्यांना पºहे जगविण्यासाठी वारंवार मागणी होत असताना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहेत.यापूर्वीच जर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन आवश्यक पाणीसाठा शिल्लक ठेवला असता तर शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळच निर्माण झाली नसती. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे शेतकऱ्यांना पऱ्हे जगविण्यासाठी देखील ऐन खरीप हंगामात पाणी मिळण्याची चिन्हे दिसेनासे झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी एकत्र येऊन लवकरात लवकर पाणी न मिळाल्यास जिल्हाधिकाºयांसमवेत पाणी प्रश्नासाठी एक बैठक घेणार असल्याचे सांगितले.उपसासिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नआता प्रकल्पात पाण्याची पातळी किती दिवसात पूर्ण होणार आहे, याबाबत अधिकाऱ्यांना निश्चित माहिती नाही. त्यामुळे शेकऱ्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे नेरला उपसा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फक्त दिवास्वप्न ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पाखाली जाऊनही शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आजही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्वरित मार्ग काढण्याची मागणी होत आहे.