शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

साहेब, घरी बसून कुटुंबाला जगवायचे तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीबांचा चरितार्थ कसा चालत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दररोज दीडशे व्हेंडरची रोजीरोटी आहे. आता प्रवाशी गाड्याच बंद आहेत. त्यामुळे येथे काम करणारे घरात बसून आहेत.

ठळक मुद्देरोजंदारी मजुरांची व्यथा : ऑटोरिक्षा चालक, रोजंदारी कामगार, शेतमजूर यांच्यावर संकट

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : साहेब, मरणाची भीती कुणाला नाही. कोरोना का काय म्हनतात तो रोग आला मंते. आता सरकारनं आमाले घरात बसवलं. कामावर गेल्याशिवाय तोंडात घास जात नाही. आता चार दिवसापासून घरात बसून आहो. किती दिवस घरात राहावे लागल सांगता येत नाही. अशा स्थितीत आम्ही कुटुंबाला कसे जगवायचे असा प्रश्न कोरोनामुळे घरात कोंडल्या गेलेले रोजंदारी मजूर आणि हातावर आणून पानावर खाणारे विचारत आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत गोरगरीबांचा चरितार्थ कसा चालत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक वास्तव पुढे आले.तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दररोज दीडशे व्हेंडरची रोजीरोटी आहे. आता प्रवाशी गाड्याच बंद आहेत. त्यामुळे येथे काम करणारे घरात बसून आहेत. रेल्वे स्टेशनवरील विक्रेता शेखर ठवकर म्हणाला, जमवलेले पैसे खर्च करणे सुरु आहे. चार ते पाच हजार रुपये हातात आहे. हा पैसा संपल्यावर काय करावे अशी चिंता आहे. कोरोनाचा कहर लवकर थांबेल असे वाटत नाही. आता शासनानेच काहीतरी उपाय योजावे असे तो म्हणाला.देव्हाडी रेल्वे स्थानक परिसरात दहा ते बारा गावातील दोन ते अडीच हजार मजूर विविध ठिकाणी जाण्यासाठी येतात. गत काही दिवसांपासून हा परिसर सुनसान झाला आहे. याच कामावर जाणारा राहुल भोयर म्हणाला, आम्ही सध्या गावात घरी बसून आहोत. घरात असलेल्या अन्नधान्यावर सध्या दिवस काढत आहोत. परंतु तोही एक दिवस संपेल. त्यानंतर आम्ही कुठून आणायचे आणि जगायचे कसे असा सवाल त्याने केला. ऑटोरिक्षा व्यवसाय करणाऱ्याचाही व्यवसाय ठप्प झाला आहे. तुमसर - देव्हाडी मार्गावर १०२ च्या वर ऑटोरिक्षा धावतात. दररोज २०० ते ३०० रुपये कमाई होते. चार दिवसापासून ऑटोरिक्षा बंद आहे. त्यामुळे या ऑटोरिक्षा चालकांचे ४०० ते ४५० कुटुंबियांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा असल्याचे ऑटोरिक्षा चालक रवी भोंगे, नामदेव धारंगे, हिफजूल कुरैशी, घनश्याम भोंगाडे, भोला मनवर यांनी सांगितले.अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही रोजमजूरी करणाऱ्यांची आहे. गावात कोणते काम नाही. घराबाहेर पडता येत नाही. घरातील अन्नधान्य पडल्यावर काय करावे आणि कुठे जावे असा सवाल कुटुंब प्रमुखांना सतावत आहे.जीवन थांबल्यासारखे जाणवतेकापड शिवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढणारा शंभू केवट म्हणाले, चार दिवसापासून एक पैसाही हातात आला नाही. आर्थिक परिस्थिती खालावली आहे. जणू काही आमचे जीवनच थांबल्यासारखे झाले आहे. कुटुंब मोठे आणि पैसा नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाढा कुठपर्यंत आणि कसा ओढावा असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार