शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:09 IST

ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात.

ठळक मुद्देसुटीत बालके कामाला। कुणी आंबे, खिरण्या, चारोळीची तर कुणी पत्रावळीची दुकाने थाटतात

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात. खेळण्या बाळगण्याच्या वयात ही निरागस बालके, साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करीत आहेत.भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर ज्या ज्या जंगल भागात रानमेवा उपलब्ध होतो. अशा परिसरात सुटीच्या दिवसात लहान मुले एकही रुपयाची लागत न लावता मेहनतीने पाच रुपये, दहा रुपये कमावताना दिसतात. यामुळे पालक तथा पाल्य दोन्ही चेहऱ्यावर बºयाचदा आनंद दिसतो. पण यात त्यांचे बालपण हरवित असते.एखाद्या सुशिक्षित, सुटा बुटातल्या गृहस्थाने, ग्राहकाने या विषयावर प्रश्न केला तर उत्तर एकच असते तो म्हणजे व्यवसाय करणे गुन्हा आहे का साहेब? बºयाच ठिकाणी लहान चिमुकले मुल पायात चप्पल नाही, अंगावर स्वच्छ कपडे नाहीत अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला व्यवसाय करताना आढळतात. कुणी चिचबिलाई, चार, पत्रावळी तर कुणी फळाने आंबे विकत असल्याचे दिसून येते. आरोग्याबबतही जागरूकता असत नाही. अशात त्यांना आजाराने ग्रासले याचा भूर्दंडही सहन करावा लागत असतो.आजही समाजात, वडिलांनी कमावले अन् मुलाने गमावले, अशी बरीच उदाहरण आहेत. मुलाला लाखो रुपये खर्च करून एखादी लहान मोठा व्यवसाय लावून दिला तरी तो वाममार्गाचा आहारी जातो. परिणामी समाजात असलेली पत व प्रतिष्ठा ही लयास जाते.अशा पालकांनी करायचे तरी काय? असा सवाल आहे. जिल्ह्यात तथा देशभरात बाल कामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आज एखाद्या गरीब घरच्या मुलाला सुरु असलेल्या शिबिरात काहीतरी नवीन शिक्षण आत्मसात करण्याची आवडही असली तरी तो तिथे पैसा व आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही.अशा मुलांना शिबिरात मोफत शिक्षणही मिळाले तरी सुद्धा कुठे ना कुठे तरी लहान मोठ्या रकमेत पैसा लागणार, या विवंचनेत ते जात नाहीत.कदाचित या भावनेमुळे तर लहान मुले बालकामगार होत नसणार? ज्याला दात आहे त्याकडे चणे नाहीत आणि ज्याकडे चणे आहेत त्याकडे दात नाही. असेही बºयाचदा समाजात, घरादारात मुलांविषयी चर्चा होताना ठिकठिकाणी ऐकायला मिळते. यामध्ये दोष कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Studentविद्यार्थी