शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:09 IST

ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात.

ठळक मुद्देसुटीत बालके कामाला। कुणी आंबे, खिरण्या, चारोळीची तर कुणी पत्रावळीची दुकाने थाटतात

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात. खेळण्या बाळगण्याच्या वयात ही निरागस बालके, साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करीत आहेत.भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर ज्या ज्या जंगल भागात रानमेवा उपलब्ध होतो. अशा परिसरात सुटीच्या दिवसात लहान मुले एकही रुपयाची लागत न लावता मेहनतीने पाच रुपये, दहा रुपये कमावताना दिसतात. यामुळे पालक तथा पाल्य दोन्ही चेहऱ्यावर बºयाचदा आनंद दिसतो. पण यात त्यांचे बालपण हरवित असते.एखाद्या सुशिक्षित, सुटा बुटातल्या गृहस्थाने, ग्राहकाने या विषयावर प्रश्न केला तर उत्तर एकच असते तो म्हणजे व्यवसाय करणे गुन्हा आहे का साहेब? बºयाच ठिकाणी लहान चिमुकले मुल पायात चप्पल नाही, अंगावर स्वच्छ कपडे नाहीत अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला व्यवसाय करताना आढळतात. कुणी चिचबिलाई, चार, पत्रावळी तर कुणी फळाने आंबे विकत असल्याचे दिसून येते. आरोग्याबबतही जागरूकता असत नाही. अशात त्यांना आजाराने ग्रासले याचा भूर्दंडही सहन करावा लागत असतो.आजही समाजात, वडिलांनी कमावले अन् मुलाने गमावले, अशी बरीच उदाहरण आहेत. मुलाला लाखो रुपये खर्च करून एखादी लहान मोठा व्यवसाय लावून दिला तरी तो वाममार्गाचा आहारी जातो. परिणामी समाजात असलेली पत व प्रतिष्ठा ही लयास जाते.अशा पालकांनी करायचे तरी काय? असा सवाल आहे. जिल्ह्यात तथा देशभरात बाल कामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आज एखाद्या गरीब घरच्या मुलाला सुरु असलेल्या शिबिरात काहीतरी नवीन शिक्षण आत्मसात करण्याची आवडही असली तरी तो तिथे पैसा व आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही.अशा मुलांना शिबिरात मोफत शिक्षणही मिळाले तरी सुद्धा कुठे ना कुठे तरी लहान मोठ्या रकमेत पैसा लागणार, या विवंचनेत ते जात नाहीत.कदाचित या भावनेमुळे तर लहान मुले बालकामगार होत नसणार? ज्याला दात आहे त्याकडे चणे नाहीत आणि ज्याकडे चणे आहेत त्याकडे दात नाही. असेही बºयाचदा समाजात, घरादारात मुलांविषयी चर्चा होताना ठिकठिकाणी ऐकायला मिळते. यामध्ये दोष कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Studentविद्यार्थी