शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:09 IST

ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात.

ठळक मुद्देसुटीत बालके कामाला। कुणी आंबे, खिरण्या, चारोळीची तर कुणी पत्रावळीची दुकाने थाटतात

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात. खेळण्या बाळगण्याच्या वयात ही निरागस बालके, साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करीत आहेत.भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर ज्या ज्या जंगल भागात रानमेवा उपलब्ध होतो. अशा परिसरात सुटीच्या दिवसात लहान मुले एकही रुपयाची लागत न लावता मेहनतीने पाच रुपये, दहा रुपये कमावताना दिसतात. यामुळे पालक तथा पाल्य दोन्ही चेहऱ्यावर बºयाचदा आनंद दिसतो. पण यात त्यांचे बालपण हरवित असते.एखाद्या सुशिक्षित, सुटा बुटातल्या गृहस्थाने, ग्राहकाने या विषयावर प्रश्न केला तर उत्तर एकच असते तो म्हणजे व्यवसाय करणे गुन्हा आहे का साहेब? बºयाच ठिकाणी लहान चिमुकले मुल पायात चप्पल नाही, अंगावर स्वच्छ कपडे नाहीत अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला व्यवसाय करताना आढळतात. कुणी चिचबिलाई, चार, पत्रावळी तर कुणी फळाने आंबे विकत असल्याचे दिसून येते. आरोग्याबबतही जागरूकता असत नाही. अशात त्यांना आजाराने ग्रासले याचा भूर्दंडही सहन करावा लागत असतो.आजही समाजात, वडिलांनी कमावले अन् मुलाने गमावले, अशी बरीच उदाहरण आहेत. मुलाला लाखो रुपये खर्च करून एखादी लहान मोठा व्यवसाय लावून दिला तरी तो वाममार्गाचा आहारी जातो. परिणामी समाजात असलेली पत व प्रतिष्ठा ही लयास जाते.अशा पालकांनी करायचे तरी काय? असा सवाल आहे. जिल्ह्यात तथा देशभरात बाल कामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आज एखाद्या गरीब घरच्या मुलाला सुरु असलेल्या शिबिरात काहीतरी नवीन शिक्षण आत्मसात करण्याची आवडही असली तरी तो तिथे पैसा व आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही.अशा मुलांना शिबिरात मोफत शिक्षणही मिळाले तरी सुद्धा कुठे ना कुठे तरी लहान मोठ्या रकमेत पैसा लागणार, या विवंचनेत ते जात नाहीत.कदाचित या भावनेमुळे तर लहान मुले बालकामगार होत नसणार? ज्याला दात आहे त्याकडे चणे नाहीत आणि ज्याकडे चणे आहेत त्याकडे दात नाही. असेही बºयाचदा समाजात, घरादारात मुलांविषयी चर्चा होताना ठिकठिकाणी ऐकायला मिळते. यामध्ये दोष कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Studentविद्यार्थी