लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महापुरात बागायती शेती उद्ध्वस्त झाल्यानंतरही शासकीय मदतीत बागायतदार शेतकऱ्यांचा उल्लेख नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क भाजीपाल्याच्या पिकांवर नांगर फिरविण्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील तामसवाडी, पांजरासह इतर गावात घडला.शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांची आर्थिक मदत घोषीत केली. परंतु त्यात बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत कोणताही उल्लेख नाही. तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील अनेक बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु आता शासनाकडून मदतच मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर फिरविला आहे.शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे. या शेतकºयांना मदत मिळाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.तामसवाडी, पांजरातुमसर तालुक्यातील तामसवाडी, पांजरा येथील शेतकरी रवी शिंदे, नामदेव शिंदे, परमानंद भांडारकर, नरेश इटवार, रामकृष्ण पांडे, जयंत इखार, देवदास ठाकरे या शेतकऱ्यांनी आपल्या बागायती शेतीत नांगरटी केली. शासनाकडून मदतच मिळणार नसली तर काय करायचे असा प्रश्न या शेतकºयांनी उपस्थित केला आहे. शेतकरी या प्रकाराने संतप्त आहेत.
धक्कादायक ! भाजीपाला पिकावर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST
शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
धक्कादायक ! भाजीपाला पिकावर फिरविला नांगर
ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील प्रकार : पूरग्रस्तांच्या शासकीय मदतीत बागायतदारांचा समावेश नसल्याने असंतोष