शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.

ठळक मुद्दे१०२२ थाळी मोफत : माविम व केंद्र चालकांचा असाही सेवाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात कामगार, बेघर व भिकारी व्यक्तींना खरा आधार मिळाला तो शासनाने सुरू केलेल्या निवारागृहाचा व शिवभोजन थाळीचा. कठीण परिस्थितीतही महिला आर्थिक विकास महामंडळाने विस्थापित व गरजू नागरीकांना त्यांच्यापर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहचवून सेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. मागील ९ दिवसात शिवभोजन केंद्रात ५५७, शासकीय वसतिगृहात ४६५ अशा १०२२ थाळी भोजन अगदी विनामूल्य दिले. यासाठी येणारा खर्च माविम अदा करणार आहे. अडचणीच्या काळात शिवभोजन थाळीने आधार दिला, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. आणि हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आलं.२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.भंडारा येथील शिवभोजन केंद्र 'नवप्रभा' लोकसंचलित साधन केंद्र भंडारा यांच्या माध्यमातुन चालविल्या जाते.व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांना आधिच मधुमेह हा आजार. पण त्यांनी सांगीतले काळजी नसावी मी बघते. अशा परिस्थितीत घरुन परवानगी मिळणार नाही ही माहिती होतीच. तरी त्यांनी होकार दिला. आणि सेवा कायार्चा प्रारंभ झाला. स्वयंपाक करणारे व व्यवस्थापन करणाऱ्या सरिता मेश्राम, सुनंदा मेश्राम, मोहन शेंडे, कुमार वैद्य यांची खरी दाद दिली पाहिजे. त्यांनीही यासाठी आपली तयारी दाखवली. मनात कोणतीही भिती नाही, जनसेवा हीच खरी सेवा हा पक्का निर्धार. कॅटिंग स्वच्छता, चवदार भोजन, येणाºयाचा आदर हा सेवाभाव एरवी दुर्मिळच. शिवभोजन केंद्रात वेळेवर पोहोचणे, जेवण तयार करणे हे लॉकडाऊनच्या काळात थोड कठीणच होत. पण घेतलेला वसा सोडायचा नाही या भावनेतून ही माणस सेवाकार्य करत आहेत. अत्यंत गरिब व अडचणीत सापडलेल्या लोकांच्या उदरनिवार्हाची व्यवस्था ही मंडळी करीत आहे. रंजना खोब्रागडे या जरी येऊ शकत नसल्या तरी घरून उत्तम व्यवस्थापन त्या करत आहेत. समाजसेवा म्हणजे आणखी असत काय.त्यांची लाभतेय अहोरात्र सेवाप्रशासन व पोलीस गरीब गरजूंना केंद्रात पाठवत आहेत. येणाऱ्यांचा ओघ असतोच अशा वेळी त्यांचा विश्वास राखणे हे सुद्धा आलेच. या काळात ही जबाबदारी कोणाला द्यावी हा प्रश्न होताच. पण या केंद्रचे व्यस्थापन पाहण्याकरिता एनयूएलएमचे क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट यांनी ही जबाबदारी स्वीकारली. पवनी क्षेत्रीय समन्वयक ललीता कुंडलकर यांनी सतत ४ दिवस आपली सेवा दिली. लेखापाल रोशन साकुरे, रत्नमाला मेश्राम, महेंद्र गिल्लोरकर या कठीण काळात २४ तास सेवा देत आहेत.लॉकडाऊनमध्ये कामगार, बेघर व भिकारी यांच्या उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाने शिवभोजन केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय केला व ५ रुपये थाळी दर ठेवला. मात्र भंडारा जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने गरजूंना शिवभोजन थाळी अगदी मोफत देण्यात येत आहे. निवारागृहात असलेल्या नागरिकांना सुद्धा शिवभोजन पुरविण्यात येते. हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून केल्या जाते. माविमने १०२२ लोकांना पुरविलेल्या शिवभोजनमूळे अनेक गरीबांच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे.- प्रदिप काठोळे, व्यवस्थापक माविम, भंडारा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshiv bhojnalayaशिवभोजनालय