शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.

ठळक मुद्दे१०२२ थाळी मोफत : माविम व केंद्र चालकांचा असाही सेवाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात कामगार, बेघर व भिकारी व्यक्तींना खरा आधार मिळाला तो शासनाने सुरू केलेल्या निवारागृहाचा व शिवभोजन थाळीचा. कठीण परिस्थितीतही महिला आर्थिक विकास महामंडळाने विस्थापित व गरजू नागरीकांना त्यांच्यापर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहचवून सेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. मागील ९ दिवसात शिवभोजन केंद्रात ५५७, शासकीय वसतिगृहात ४६५ अशा १०२२ थाळी भोजन अगदी विनामूल्य दिले. यासाठी येणारा खर्च माविम अदा करणार आहे. अडचणीच्या काळात शिवभोजन थाळीने आधार दिला, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. आणि हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आलं.२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.भंडारा येथील शिवभोजन केंद्र 'नवप्रभा' लोकसंचलित साधन केंद्र भंडारा यांच्या माध्यमातुन चालविल्या जाते.व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांना आधिच मधुमेह हा आजार. पण त्यांनी सांगीतले काळजी नसावी मी बघते. अशा परिस्थितीत घरुन परवानगी मिळणार नाही ही माहिती होतीच. तरी त्यांनी होकार दिला. आणि सेवा कायार्चा प्रारंभ झाला. स्वयंपाक करणारे व व्यवस्थापन करणाऱ्या सरिता मेश्राम, सुनंदा मेश्राम, मोहन शेंडे, कुमार वैद्य यांची खरी दाद दिली पाहिजे. त्यांनीही यासाठी आपली तयारी दाखवली. मनात कोणतीही भिती नाही, जनसेवा हीच खरी सेवा हा पक्का निर्धार. कॅटिंग स्वच्छता, चवदार भोजन, येणाºयाचा आदर हा सेवाभाव एरवी दुर्मिळच. शिवभोजन केंद्रात वेळेवर पोहोचणे, जेवण तयार करणे हे लॉकडाऊनच्या काळात थोड कठीणच होत. पण घेतलेला वसा सोडायचा नाही या भावनेतून ही माणस सेवाकार्य करत आहेत. अत्यंत गरिब व अडचणीत सापडलेल्या लोकांच्या उदरनिवार्हाची व्यवस्था ही मंडळी करीत आहे. रंजना खोब्रागडे या जरी येऊ शकत नसल्या तरी घरून उत्तम व्यवस्थापन त्या करत आहेत. समाजसेवा म्हणजे आणखी असत काय.त्यांची लाभतेय अहोरात्र सेवाप्रशासन व पोलीस गरीब गरजूंना केंद्रात पाठवत आहेत. येणाऱ्यांचा ओघ असतोच अशा वेळी त्यांचा विश्वास राखणे हे सुद्धा आलेच. या काळात ही जबाबदारी कोणाला द्यावी हा प्रश्न होताच. पण या केंद्रचे व्यस्थापन पाहण्याकरिता एनयूएलएमचे क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट यांनी ही जबाबदारी स्वीकारली. पवनी क्षेत्रीय समन्वयक ललीता कुंडलकर यांनी सतत ४ दिवस आपली सेवा दिली. लेखापाल रोशन साकुरे, रत्नमाला मेश्राम, महेंद्र गिल्लोरकर या कठीण काळात २४ तास सेवा देत आहेत.लॉकडाऊनमध्ये कामगार, बेघर व भिकारी यांच्या उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाने शिवभोजन केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय केला व ५ रुपये थाळी दर ठेवला. मात्र भंडारा जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने गरजूंना शिवभोजन थाळी अगदी मोफत देण्यात येत आहे. निवारागृहात असलेल्या नागरिकांना सुद्धा शिवभोजन पुरविण्यात येते. हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून केल्या जाते. माविमने १०२२ लोकांना पुरविलेल्या शिवभोजनमूळे अनेक गरीबांच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे.- प्रदिप काठोळे, व्यवस्थापक माविम, भंडारा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshiv bhojnalayaशिवभोजनालय